कणकवलीत ११ वा. पर्यंत गर्दी नंतर ग्राहक गायब

कणकवलीत ११ वा. पर्यंत गर्दी नंतर ग्राहक गायब

*कोकण Express*

*कणकवलीत ११ वा. पर्यंत गर्दी नंतर ग्राहक गायब…*

*पोलीस, नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून नियमांची कडक अंमलबजावणी….!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र शासनाने २२ एप्रिल रोजी नव्याने १ मे पर्यंत परिपत्रक जारी करत नवे निर्देश जारी केलेत. त्यानुसार सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी देखील काल परिपत्रक काढत कडक अंमलबजावणीचे आदेश पोलिस विभाग व प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या कडक संचार बंदीची अमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. मात्र तत्पूर्वी सकाळी उद्या विकेंड लॉकडाऊनमुळे सर्वच दुकाने बंद असल्याने शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत बाजारपेठेसह महामार्गावर नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

मुंबई-गोवा महामार्ग इतर काळात मोठ्या संख्येने वाहनांच्या वर्दळ असते. मात्र सध्याच्या काळात संचारबंदी असल्यामुळे मालवाहक व तुरळक खाजगी वाहने सोडता वाहतूक मंदावली आहे.तसेच कणकवली शहरात डीपी रोड व महामार्गावर काही भाजीविक्रेते बसतात. त्या ठिकाणी सकाळी सात ते अकरा या वेळेत मोठी नागरिकांची खरेदीसाठी गर्दी असते. मात्र अकरा वाजता कणकवली पोलिस व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी संपूर्ण बाजारपेठेसह हायवे वर बसलेल्या विक्रेत्यांना दुकान बंद करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कणकवली शहरात अकरा सव्वा अकरा वाजेपर्यंत पूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस देखील कणकवली शहरात फिरत होते. तसेच तालुक्यासह जिल्हाभरात अशीच अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पसरत चालला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!