*कोंकण एक्सप्रेस*
*कुठे गालबोट लागत असेल तर त्याचा बंदोबस्त करू – आमदारनिलेश राणे*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
महायुतीचे सर्व उमेदवार कसे निवडून येतील याबाबत आमची चर्चा होती. जशी आम्ही महायुतीबाबत खबरदारी घेतो तशी भाजपनेसुद्धा घ्यायला हवी. याबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. जिल्ह्रात पन्नासही जागा महायुती जिंकू शकते अशी परिस्थिती आहे. मात्र, काही उमेदवारांची धाकधूक माझ्या कानावर आली आहे. तुमची कुठे अडचण होईल, असे आम्ही होऊ देणार नाही, याचा बंदोबस्त आम्ही करू. महायुती एक आणि एकच राहणार. जर कुठे गालबोट लागत असेल तर त्याचा बंदोबस्त करू. आमदार केसरकर ज्येष्ठ आहेत. ते त्यांचे काम करीत आहेत. जी काय गडबड सुरू आहे ती माझ्या कानावर आली आहे आणि त्यावर उपायही मी सांगितले आहेत. त्यामुळे तुम्ही निवडणुकीवर लक्ष ठेवा. निवडून या, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी वेंगुर्ला येथे केले.
वेंगुल्र्यात आज शिंदेसेनेच्या कार्यालयात आमदार निलेश राणे यांनी जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्·ाभूमीवर उमेदवार व प्रमुख पदाधिका-यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी बंद खोलीत झालेल्या चर्चेत उमेदवारांनी आपल्याला येत असलेल्या अडचणींबाबत आमदार राणे यांच्याकडे व्यथा मांडली. यानंतर उपस्थित उमेदवार व पदाधिका-यांना निलेश राणे यांनी संबोधित करीत नवी ऊर्जा दिली. यावेळी शिंदेसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, प्रभारी तालुकाप्रमुख सचिन देसाई, युवासेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, बाळा दळवी, सुनिल मोरजकर, काशिनाथ नार्वेकर, शितल साळगांवकर यांच्यासहीत तालुक्यातील शिवसेनेचे उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, आज या निवडणुकीत जिल्ह्रात महायुतीला चांगले वातावरण आहे. ज्याप्रमाणे वेंगुर्ला तालुक्यातील उमेदवारांना आमदार राणे यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सावंतवाडी व दोडामार्ग याठिकाणी सुद्धा आपला वेळ द्यावा. महायुतीच्या विरोधात तिस-या शक्तीने उभे केलेले अपक्ष उमेदवार हे पडले पाहिजेत यासाठी काम करा असे आवाहन त्यांनी केले.

