*कोकण Express*
*गोव्यात ये-जा करणार्यांनी सुरक्षेसाठी गृह अलगीकरणात रहावे*
*सौ अनिषा दळवी ; कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे तरुण-तरुणींना आवाहन…*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
गोव्यात नोकरी निमित्त कामानिमित्त रोज ये-जा करणार्या दोडामार्गसह सावंतवाडी व वेंगुर्ला येथील नोकरदारांनी घरी आल्यानंतर आपल्या कुंटूबासह शेजार्यांच्या सुरक्षीततेसाठी गृह अलगीकरणात रहावे, शक्य असेेल तर गोव्यातच थांबावे, असे आवाहन जिल्हा परिषदच्या आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी केले आहे. दरम्यान गेले काही दिवस गोव्यात येणार्या-जाणार्या युवकांचे नमुने कोरोना पॉझिटीव्ह येत आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सौ.दळवी यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, जिल्ह्यात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. एकीकडे वाढती संख्या असली तरी ऑक्सीजन आणि आवश्यक रेमिडीसीयर इंजेक्शन मिळण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे आपल्या कुंटूबासह शेजार्यांच्या सुरक्षतेसाठी हा निर्णय घेणे गरजेचे आहे. आपण लोकांची गरज लक्षात घेता, नोकरीवर जाण्यापासून कोणाला अडवू शकत नाही, परंतू काळजी घेणे आपल्या हातात आहे. शक्य असल्यास रोज ये-जा न करता कामाच्या ठिकाणी राहता येणे शक्य होईल, यासाठी सकारात्मक भूमिका ठेवावी, असे दळवी यांनी म्हटले आहे.