*कोंकण एक्सप्रेस*
कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही घाबरत नाही!, सावंतवाडीत ऐक्य टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध! – ॲड निता सावंत-कविटकर यांचे प्रतिपादन.
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सावंतवाडीतील तमाम जनतेची सुरक्षा व सांवतवाडीची शांतता टिकविण्यासाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केला तरी घाबरत नाही. कारण सावंतवाडीत आमचे नेते दीपक केसरकर यांनी कायम राखलेली शांतता ऐक्य टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे,. ती आम्ही निष्ठेने पार पाडू तसे प्रतिपादन नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविलेल्या सावंतवाडी सेनेच्या उमेदवार ॲड. निता सावंत कविटकर यांनी केले आहे.

