*कोंकण एक्सप्रेस*
*राजापूरच्या वरचीपेठ गोविंदा पथकाने फोडली 55 हजाराची दहीहंडी !*
*कळसूलीतील दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*कळसूली ः प्रतिनिधी*
राजापूरच्या गोविंदा पथकाला चषक व बक्षिस प्रदान करताना प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत व ग्रामस्थ.
19 एसआय 6
कणकवली ः पुढारी वृत्तसेवा
गोविंदा आला…रे आला…च्या जयघोषात थरावर थर लावून डिजेच्या तलावर नाचत मोठ्या उत्साहात कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या कळसुली सारख्या ग्रामीण भागात श्री स्वामी समर्थ मठ येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. प्रेमदया प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष हनुमंत सावंत आणि श्री स्वामी समर्थ मठ कळसुली यांच्या माध्यमातून स्वामी समर्थ मठासमोर 6 थरांची 55 हजार 555 रू. बक्षिसाची दहीहंडी राजापूरच्या वरचीपेठ गोविंदा पथकाने फोडली. गोविंदाचा हा थरार याची देही याची डोळा अनुभवायला नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
यावेळी विविधारंगी गाण्यांच्या तालावर नृत्य आविष्कार सादर करण्यात आला. या दहीहंडी उत्सवामध्ये श्री काळंबा गोविंदा पथक डिगस कुडाळ, जय वेतोबा गोविंदा पथक वेतोबा बांबर्डे कुडाळ, माजी पोलिस पाटील कै. वासुदेव सिताराम इंदप कोळीशी कणकवली, वरचीपेठ गोविंदा पथक राजापूर आदीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागरी जिल्ह्यातील गोविंदा पथक कळसुलीत दाखल झाले होते.
यावळी प्रेम दया प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष हनुमंत सावंत,माजी तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप सावंत, सामाजिक कार्यकर्ते किरण सावंत, ओंकार दळवी, माजी ग्रा.पं. सदस्य, किशोर घाडीगावकर, हेमंत वारंग, सामाजिक कार्यकर्ते पंढरी जाधव, ग्रा.पं. सदस्या भावना तावडे, मयुर ठाकूर, उत्तम नगर पोलिस पाटील सुयश जंगले, कणकवली पोलिस स्टेशन कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच कळसुली पंचक्रोशीसह जिल्ह्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.