किनारपट्टी विकासातील आर्थिक समृद्धी हे महायुती सरकारचे ध्येय : मंत्री नितेश राणे

किनारपट्टी विकासातील आर्थिक समृद्धी हे महायुती सरकारचे ध्येय : मंत्री नितेश राणे

*कोंकण एक्सप्रेस*

*किनारपट्टी विकासातील आर्थिक समृद्धी हे महायुती सरकारचे ध्येय : मंत्री नितेश राणे*

किनारपट्टी विकासातील आर्थिक समृद्धी हे महायुती सरकारचे ध्येय असून यासाठीच रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील अनेक वर्ष जुन्या अतिक्रमणाना हटवून आज येथे विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ही कामे वेळेत पूर्ण होतील तसेच येथील मच्छिमांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार आणि मत्स्य विभाग कटिबद्ध असून भविष्यात येथे विविध विकासकामे करून मिरकरवाडा हे बंदर सक्षम बंदर केले जाईल असा विश्वास यावेळी दिला.

मिरकरवाडा बंदराच्या टप्पा-२ अंतर्गत लिलाव गृह, जाळी विणकाम गृह, प्रशासकीय इमारत, संरक्षक भिंत, अस्तित्वात असलेल्या जेट्टीचे सक्षमिकरण, पाण्याची टाकी, प्रसाधनगृह, काँक्रिट जाण्या-येण्याकरीता रस्ते, उत्तरेकडील ब्रेकवॉटरचे टॉप काँक्रिट रक्कम अशी रु.२२.४३ कोटी इतक्या रकमेच्या कामांचा भूमीपूजन समारंभ आज पार पडला.
या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत हेही उपस्थित होते. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!