आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या सिंधुदुर्गातील संघर्षयात्रींचा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते गौरव

आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या सिंधुदुर्गातील संघर्षयात्रींचा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते गौरव

*कोंकण एक्सप्रेस*

*आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या सिंधुदुर्गातील संघर्षयात्रींचा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते गौरव*

*सिंधुदुर्गनगरी*

देशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला आज २५ जून रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आणीबाणीत कारावास भोगलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघर्षयात्रींचा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्यावतीने सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, आरती देसाई, शारदा पोवार, संघर्षयात्री गजानन पणशीकर, नवनगर विकास प्राधिकरणाचे सदस्य प्रभाकर सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र, गुलाबपुष्प देवून कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाची पाहणी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्यासह मान्यवरांनी केली.

जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, देशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला आज २५ जून रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. १९७५ ते १९७७ या दरम्यान लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मूल्यांच्या जपवणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीत अनेक जणांनी योगदान दिलं. या लढ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. आणीबाणीच्या या लढ्यात संघर्षयात्रींनी सामाजिक आणि राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेला होता त्यांचे हे कार्य सदैव स्मरणात राहिल असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
यावेळी श्री. गजानन पणशीकर यांनी आणि प्रभाकर सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शासनस्तरावर त्यांच्या संघर्षांची दखल घेवून सन्मान केल्याबाबत श्री पणशीकर यांनी राज्य शासनाचे आभार मानले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुकटे यांनी प्रास्ताविकात देशात आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेस आज 50 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा व त्यांच्या वारसांचा सत्कार करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश पवार यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी मानले.
यावेळी केंद्र शासनामार्फत आणीबाणीवर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. याठिकाणी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून देशात सन 1975 ते 1977 मध्ये लावलेल्या आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले. हे प्रदर्शन २७ जून पर्यंत नागरीकांना बघण्यासाठी उपलब्ध असणार आहे. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी केले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील रवी देवरे, सचिन वाघ, अमित राणे, शंकर आडेलकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
यांचा झाला सन्मान

अनिल कालिदास मोंडकर, अरुण नारायण सिध्‍दये , विजयकुमार (विजय) भिकाजी मराठे , उदय देवेंद्रनाथ जोशी , प्रकाश अनंत सबनीस, विजय राजाराम जगताप, सुंदर शिवाजी जगताप, सुभाष वसंतराव साटम, प्रदिप लक्ष्‍मण गोळवणकर, गजानन शंकर पणशीकर, बाबुराव सदाशिव भुजबळ, कृष्‍णा सदाशिव शिरोडकर, श्रीकांत वामनराव भोसले, श्रीम.मालती श्रीधर काळे, प्रभाकर दिनकर मराठे, ध्रुवकुमार शिवहरी रानडे, अजय जयराम जोशी, दत्ताराम बाळकृष्ण शेटकर, मकरंद मधुकर नानल, सावळाराम राजाराम सावंत,नारायण जगन्नाथ वझे, श्रीकृष्ण गोविंद शिरसाट, किशोर पुरुषोत्तम नाईक, रमाकांत विठ्ठल नाईक, सुहास केशव रानडे, अरुण श्रीराम गोगटे, शशिकांत जनार्दन कुलकर्णी, वासुदेव बाबुराव मालवणकर, विश्वास मारुती जोशी, अजित मधुकर तिरोडकर, अशोक पुंडलिक प्रभू, दिवंगत गुरुनाथ शांताराम शिरसाट वारस पत्‍नी श्रीम. विजया गुरुनाथ शिरसाट, दिवंगत भास्‍कर योगेश नाडकर्णी वारस पत्‍नी श्रीम. राधाबाई भास्कर नाडकर्णी, दिवंगत श्रीपाद नृहसिंह काणेकर वारस पत्‍नी श्रीम. आशालता श्रीपाद काणेकर, दिवंगत विजय वासुदेव रुमडे वारस पत्‍नी श्रीम. विजया विजय रुमडे, दिवंगत विठ्ठल सखाराम सावंत वारस पत्‍नी श्रीम. रुक्मिणी विठ्ठल सावंत, दिवंगत नारायण विष्‍णू गोडसे वारस पत्‍नी श्रीम. मंदाकिनी नारायण गोडसे, दिवंगत प्रकाश महादेव जाचक वारस पत्‍नी श्रीम. शितल प्रकाश जाचक, दिवंगत धनंजय भिकाजी मराठे वारस पत्‍नी श्रीम.धनश्री धनंजय मराठे, दिवंगत चंद्रकांत रघुनाथ खडपकर वारस पत्‍नी श्रीम. सुरेखा चंद्रकांत खडपकर, दिवंगत श्रीराम विनायक झारापकर वारस पत्‍नी श्रीम.नंदिनी श्रीराम झारापकर, दिवंगत विजय सिताराम बोंडाळे वारस पत्‍नी श्रीम.विनया विजय बोंडाळे, दिवंगत वसंत शंकर मुणगेकर वारस पत्‍नी श्रीम. वैशाली वसंत मुणगेकर, दिवंगत वसंत जगजीवन झांटये वारस पत्‍नी वर्षा वसंत झांटये, यांचा जिल्हाधिकारी श्री पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र, गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!