*संस्कारातून मिळवलेली गुणवत्ता शाळेचे वैभव- अजयराज वराडकर*

*संस्कारातून मिळवलेली गुणवत्ता शाळेचे वैभव- अजयराज वराडकर*

*कोंकण एक्सप्रेस*

*संस्कारातून मिळवलेली गुणवत्ता शाळेचे वैभव- अजयराज वराडकर*

*मालवण : प्रतिनिधी*

योगात्मा डॉ. काकासाहेब वराडकर यांनी स्थापन केलेल्या प्रशालेची शतक महोत्सवी वर्षातील वाटचाल ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब असून प्रशालेने संस्काराच्या माध्यमातून मिळवलेली गुणवत्ता टिकवली आहे. आज शैक्षणिक गुणवत्ते बरोबर संस्कार महत्त्वाचे असून संस्कारातून मिळवलेली शाळेची गुणवत्ता हे शाळेचे वैभव असते या शतक महोत्सवी प्रवासामध्ये अशा अनेक पिढ्या या ठिकाणी निर्माण झाल्या व आपल्या आयुष्यात यशस्वी झाल्या आहेत. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने कौशल्याधिष्ठित शिक्षण देऊन परिसरातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण सुरू केले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करताना प्रशालेतील विद्यार्थी घडवण्यामागे पालकांची ही तितकीच जबाबदारी वाढलेली असून तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या मुलावर संस्कार महत्त्वाचे आहेत. हे कार्य शाळा व पालक, हितचिंतक पर्यायने समाजाच्या माध्यमातून करू व दशक्रोशीतील युवकांना सर्व क्षेत्रात यशस्वी करू असा मानस शाळा प्रवेशोत्सव अभिनंदन कार्यक्रमाच्या निमित्ताने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज शरद वराडकर यांनी सभा स्थानी व्यक्त केला.
या कार्यक्रमावेळी संस्था सचिव सुनील नाईक यांनी पाचवी ते बारावी पर्यंत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना पालकांनी शाळेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल प्रशंसा करून समाधान व्यक्त केले. संस्थेने शालेय शिस्त, उपक्रमशील प्रशाला, कौशल्याधिष्ठित रोजगाराभिमुख शाळा म्हणून ओळख निर्माण केली असून विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर (नि.) यांच्या “गावी रहा मोठे व्हा” या संकल्पनेतून कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्याचे कार्य शाळेत सुरू आहे. संस्थेचे माजी विद्यार्थी चित्तरंजन जठार परिवारातर्फे प्रशालेला दिलेल्या देणगी बद्दल तसेच समाजसेवक निलेश सांबरे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक वस्तूंचा उल्लेख करीत असताना या दात्यांच्या माध्यमातून संस्थेला मिळालेल्या मदतीबद्दल गौरव उद्गार काढले. संस्थेची वाटचाल ही शतकमहोत्सवी वर्षाकडे होत असून यासाठी दशक्रोशीतील माजी विद्यार्थी, हितचिंतक, समाजसेवक, शिक्षक, विद्यार्थी यांचे योगदान मोठे असून शतक महोत्सवी वर्षाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपणास मिळत असून या कार्यास आपल्या सर्वांचे योगदान मिळेल असा आशावाद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.देवयानी धनंजय गावडे यांनी करताना प्रशालेच्या वैशिष्टपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती दिली प्रशालेतील सर्व विषयांतर्गत राष्ट्रीय स्तर, राज्यस्तर,विभागस्तर, तालुकास्तरावरील यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यां बद्दल माहिती देताना प्रशालेचा उत्कृष्ट कार्याबद्दलचा आलेख असाच कायम ठेवण्याची ग्वाही दिली.
या वेळी विद्यार्थी, शिक्षक यांच्या साहित्यिक लेखांचा संग्रह असणाऱ्या “वंदना” अंकाचे अनावरण करण्यात आले.
त्याच बरोबर प्रशालेतील इतिहास, समाजशास्त्र विभागामार्फत घेण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेतील, गणित विषयांर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय परीक्षेतील व डॉ.काकासाहेब वराडकर टेलेंट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्याचा शालेय भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तयार केलेला सेल्फी पॉईंट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर क. पं. शि. प्र मंडळाच्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई,खजिनदार रविंद्रनाथ पावसकर,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री.सुधीर वराडकर, पर्यवेक्षक श्री.महेश भाट, वराडकर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री.ऋषिकेश नाईक, डॉ.दादासाहेब कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, माजी विद्यार्थी आणि पालक डॉ.कमलेश चव्हाण सर्व विभागातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी पालक हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.संजय चंद्रकांत पेंडुरकर, सौ.विणा शिरोडकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!