*छत्रपती शिवाजी महाराजांचा असा वारंवार अपमान औरंग्याचीच अवलादच करू शकते!- इर्शाद शेख*

*छत्रपती शिवाजी महाराजांचा असा वारंवार अपमान औरंग्याचीच अवलादच करू शकते!- इर्शाद शेख*

*कोंकण एक्सप्रेस*

*छत्रपती शिवाजी महाराजांचा असा वारंवार अपमान औरंग्याचीच अवलादच करू शकते!- इर्शाद शेख*

*सिंधुदुर्ग*

मालवण तालुक्यातील ऐतिहासिक आणि सागरी परंपरेने समृद्ध असलेल्या राजकोट परिसरात पूर्वी उभारण्यात आलेला पुतळा काही महिन्यातच कोसळला होता आणि छत्रपतींचा फक्त राजकारणासाठी वापर करणारे हे महायुतीचे निर्लज्ज सरकार छत्रपतींच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा कीती भ्रष्टाचार करू शकते हे जनतेने पाहिले होते. फक्त छत्रपती शिवाजीमहाराजांच्या नावामुळे हा भ्रष्टाचार जनतेने सहन केला आणि सरकारने या भ्रष्टाचारावर पांघरूण घालून अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा नव्याने उभारण्यात आला होता. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अभिमानाचा आणि श्रद्धेचा विषय असलेला हा पुतळा केवळ एक शिल्प नसून, ते देशाच्या स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे.

मात्र, अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह बाब म्हणजे या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळील भराव कोसळला आहे. ही घटना नुसती प्रशासनाची हलगर्जी नाही, तर ती शिवचरित्राचा, महाराजांच्या स्मारकाचा आणि जनतेच्या भावनांचा अवमान आहे.

यामागील कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई झाली पाहिजे. केवळ देखावे करून छत्रपतींच्या नावाचा उपयोग करणाऱ्या जबाबदार यंत्रणांनी हे लक्षात घ्यावे की
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत, आणि त्यांच्या पुतळ्याशी संबंधित कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा आम्ही पुन्हा पुन्हा सहन करणार नाही.

जर तातडीने दुरुस्ती आणि चौकशी होऊन जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हेदाखल न झाल्यास जनतेच्या भावना उफाळून येतील आणि जे जे मंत्री,नेते या नूतन पुतळ्याच्या आनावरण सोहळ्यास उपस्थित होते त्या सर्वांच्या निवासस्थाना समोर तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेण्याची वेळ येईल. केंद्र शासनाने, राज्य शासनाने व प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी.
पुर्वी जो पुतळा उभारताना छत्रपति शिवाजीमहाराजांच्या डोक्यावर जखमेची खूण जाणूनबुजून दाखविण्यात आली होती. ही खूण म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजीमहाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला त्या वेळी अफजल खानाच्या बाजूने धाऊन आलेल्या आणि शिवाजीमहाराजांच्या डोक्यावर तलवारीने वार करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णीच्या तलवारीने झालेली ती जखम होती. छत्रपती शिवाजीमहाराज आपल्या कारकीर्दीत अनेक युद्ध लढले पण त्यांनी एक ही वार शरीरावर होऊ दिला नाही. फक्त एकच वार त्यांच्या डोक्यावर झाला तो कृष्णा भास्कर कुलकर्णी ने केलेला वार होता आणि ही सल आजही छत्रपती शिवाजीमहाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्याच मना मध्ये आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांचा असा वारंवार होणारा अपमान आम्ही सहन करणार नाही. तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची दखल शासनाने घ्यावी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहिल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!