गाबीत समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु :श्री विष्णू मोंडकर मालवण तालुका अध्यक्ष भाजपा

गाबीत समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु :श्री विष्णू मोंडकर मालवण तालुका अध्यक्ष भाजपा

*कोंकण एक्सप्रेस*

*गाबीत समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु :श्री विष्णू मोंडकर मालवण तालुका अध्यक्ष भाजपा*

*पालकमंत्री नितेशजी राणे आमदार निलेश राणे यांचे विशेष योगदान*

*मालवण ः प्रतिनिधी*

राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून सत्ता स्थापन झाल्यानंतर विशेषतः नितेश राणे यांनी पालकमंत्री ,मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मच्छिमार समाजाच्या अनेक वर्षे प्रलंबित विषयावर प्रशासकीय पातळीवर धोरणात्मक निर्णय प्रकिया गतिमान झाली असून अनधिकृत मासेमारी बंदी ,मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा सारखे निर्णय घेण्यात आले आहेत अश्याच एक अनेक वर्षे प्रलंबित गाबीत समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन होण्यासाठी दिनांक २७ मे २०२५ रोजी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे यांच्या अध्यक्षतेखाली गाबीत समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात सकारात्मक बैठक मंत्रालय येथे पार पडली.या बैठकीला मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री मा. नितेश राणे साहेब व आमदार मा. निलेश राणे साहेब, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद सिंगल तसेच गाबीत समाजाचे प्रमुख प्रतिनिधी श्री सुनिल जोशी व शिष्टमंडळ श्री सखाराम मालाडकर, श्री अविनाश कुबल, श्री दिलीप गिरप, श्री रविंद्र कोयंडे, श्री धर्माश्री गणेश फडके इ. उपस्थित होते.गाबीत समाजाची प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबईत वस्ती असून, हा समाज पारंपरिकपणे मासेमारी व सागरी व्यवसायाशी निगडित आहे. बदलत्या युगात टिकण्यासाठी आर्थिक सक्षमीकरण आवश्यक आहे. ही गरज ओळखून स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा ठोस निर्णय शासन पातळीवर घेण्यात आला या विषयी प्रकिया सुरु करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले असून तूर्तास ओबीसी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज पुरवठा, व्याज परतावा व कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या योजनांचा लाभ कोकणातील गाबीत समाजाला देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करावे, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा. श्री. अतुलजी सावे यांनी दिले.कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे हे या निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभागी होते. गाबीत समाजाच्या महामंडळ निमिर्ती साठी ठाम भूमिका मांडत त्यांनी समाजाची व्यथा मंत्री महोदयांसमोर प्रभावीपणे मांडली.या महामंडळ निर्मिती मुळे गाबीत समाजातील जिल्ह्यातील 121 किलोमीटर सागरी किनारपट्टीवर वसलेल्या 25000 हजार कुटूंबियांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी सरकारच्या माध्यमातून आश्वासक दिशा मिळणार असल्याचे मत विष्णू मोंडकर तालुका अध्यक्ष भाजपा मालवण यांनी व्यक्त केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!