*कोंकण एक्सप्रेस*
*वैभववाडीत ऑपरेशन सिंदूर तिरंगा रॅली’ संपन्न…*
*सैन्य दलासाठी नागरिकांची दिसली एकजुट…*
*वैभववाडी / प्रतिनिधी*
वैभववाडीत ऑपरेशन सिंदूर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भरपावसात निघालेल्या रॅलीला नागरिकांची एकजुट दिसली, या रॅलीत सर्व पक्षीय पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संभाजी चौक ते दत्त मंदिर व पुन्हा संभाजी चौक अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत बाजारपेठ दणाणून सोडली.
दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये निष्पाप भारतीय नागरिकांची हत्या केली. भारतीय सैन्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांचा ऑपरेशन सिंदूर राबवत स्वात्मा केला. भारतीय सैन्यबलांचे अभिनंदन करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी वैभववाडी शहरात ‘ऑपरेशन सिंदूर तिरंगा रैली’ मोठ्या उत्साहात संपन्न केली. या रॅलीत परिसरातील बंधूभगिनी जाती, धर्म व पक्षीय भेदाभेद विसरून एकजुटीने केवळ भारतीय म्हणून हाती तिरंगा घेऊन सहभागी झाले होते.
“भारत माता की जय, वंदे मातरम, हम सेना के साथ है, ऑपेरेशन सिंदूर के साथ है अशा घोषणा देत रॅली उत्साहात पार पडली.
सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, श्रध्दा रावराणे, प्राची तावडे, नेहा माईणकर, राजेंद्र राणे, सज्जनकाका रावराणे, नवलराज काळे, वैभव रावराणे, अतुल सरवटे, प्रदीप रावराणे, स्वप्रिल खानविलकर, रितेश सुतार, प्रकाश पाटील, संताजी रावराणे, प्रकाश सावंत, सरपंच, शासकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशाताई, सर्व नगरसेवक, विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक, शिक्षक, डॉक्टर, रिक्षा चालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.