*कोंकण एक्सप्रेस*
*गणेशोत्सवापूर्वी चाकरमान्यांसाठी आता जलवाहतुकीचा पर्याय*
*माझगाव ते मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत धावणार एम टू एम बोट*
मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाताना चाकरमान्यांना रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडीने होणारी परवड आणि वेळखाऊ प्रवास… हा त्रास नेहमीचाच झाला आहे. आता या त्रासातून दिलासा देण्यासाठी मत्स्य व बंदरे विभागाकडून मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. याकरिता एम टू एम बोट वापरली जाणार असून येत्या २५ मे रोजी ती मुंबईतील भाऊचा धक्का येथे दाखल होणार आहे. गणेशोत्सव सणासाठी तीन महिन्यांपूर्वी रेल्वे, एसटीच्या तिकीट आरक्षण प्रक्रियेला सुरुवात होते. दरवर्षी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती संख्या लक्षात घेता, अनेकदा रेल्वेचे तिकीट मिळत नाहीत. परिणामी विनाआरक्षण प्रवासाचे दिव्य पार करावे लागते. दुसरीकडे रस्ते मार्गाने जायचे म्हटले तर मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे येथेही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचे खूप हाल होतात. नियोजित स्थळी पोहोचण्यास बराच वेळ लागतो. गावी गेल्यानंतरही खासगी वाहनांसाठी खिशाला कात्री लागते. मात्र यंदा चाकरमान्यांना कमी वेळेत गावी पोहोचण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे
रामदास बोट दुर्घटनेनंतर कोकणची जलवाहतूक ठप्प झाली होती. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हायटेक यंत्रणा असलेल्या एम टूएम या बोटीमार्फत पुन्हा एकदा जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मुंबईतील माझगाव डॉक येथून प्रवास सुरू होईल. जवळपास साडेचार तासांत कोकणातील मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरीपर्यंत पोहोचता येईल. लवकरच चाकरमान्यांना परवडतील असे दर यासाठी निश्चित केले जातील. त्यामुळे कोकणातील प्रवाशांसाठी हा सुखकर प्रवास असेल, असे राणे म्हणाले.
यांच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. याकरिता एम टू एम ही बोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे प्रयोजन आहे.