गोवर्धन गोशाळेच्या द्वारे राणेंनी कोकणविकासला, नैसर्गिक शेतीला चालना मिळेल – मुख्यमंत्री फडणवीस

गोवर्धन गोशाळेच्या द्वारे राणेंनी कोकणविकासला, नैसर्गिक शेतीला चालना मिळेल – मुख्यमंत्री फडणवीस

*कोंकण एक्सप्रेस*

*गोवर्धन गोशाळेच्या द्वारे राणेंनी कोकणविकासला, नैसर्गिक शेतीला चालना मिळेल – मुख्यमंत्री फडणवीस*

*कणकवली ः प्रतिनिधी*

हाती घेतलेले कार्य परफेक्ट होण्याकडे खासदार राणेंचा कटाक्ष असतो.गुणवत्तेचे राणे पारखी आहेत.याच गुणवत्तेच्या जोरावर राणेंनी गोवर्धन गोशाळा उभारली आहे. या भागातील शेतकऱ्यांना व्यवसायाभिमुख ट्रेनिंग दिले जाणार आहे. कृषी आणि पशु संवर्धनाचे हे केंद्र तयार झाले आहे. सनातन संस्कृती ही केवळ मूर्तिपूजक नसून ती कृषी निसर्ग पूजक आहे. सनातन संस्कृतीमध्ये गोमतेला उच्च दर्जा आहे.गोमाता आपण आईसमान मानतो.कृषी संस्कृतीत गोमातेला अन्यासाधरण महत्व आहे. गाय ही आजन्म देणारी आहे म्हणून ती कामधेनू आहे. राज्यात जिथे गोधन कमी झाले तिथे आत्महत्येचे प्रमाण वाढले. गोधनामुळे नैसर्गिक खत मिळायचे. कॅश क्रॉप मुळे नैसर्गिक शेती पद्धतीपासून दूर गेला. केमिकल शेतीचे दुष्परिणाम भोगल्यानंतर शेतकरी आता नैसर्गिक शेतीकडे पून्हा वळू लागला आहे. नैसर्गिक शेती गोमतेच्या संवर्धनाशिवाय अशक्य आहे. देशी गायींना चाऱ्याचे अनुदान आमच्या सरकारने सुरू केले आहे. ब्राझील देशाने आपल्या गीर, सेहवाल गायी नेऊन स्वतःची श्वेतक्रांती केली. राणेंच्या गोवर्धन गोशाळेत गीर , साहिवाल कपिला गाईंसह अन्य देशी गाय बघून आनंद झाला. शेणापासून रंग तयार होण्यासाठी राज्य सरकार ठोस पावले उचलणार आहे. कसायांकडे जाणाऱ्या भाकड गायीसुद्धा या गोशाळेत घेऊन त्याचे जतन केले जाणार आहे याचाही आनंद आहे.
राजकोट किल्ल्यावर जाऊन देशातील सर्वात उंच पुतळ्याचे आज आम्ही पूजन केले. शिवपुतळ्याकडे शिव आरती करून पुतळ्याचे लोकार्पण केले.आणि आता गोवर्धन गोशाळेचे उदघाटन केले हा दुहेरी योग असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!