कविवर्य आ. सो. शेवरे यांच्या कवितेत एकूण मानवी कल्याणाचाच विचार

कविवर्य आ. सो. शेवरे यांच्या कवितेत एकूण मानवी कल्याणाचाच विचार

*कोकण Express*

*कविवर्य आ. सो. शेवरे यांच्या कवितेत एकूण मानवी कल्याणाचाच विचार*

*’शेवरे व्यक्ती आणि वाड:मय’ व्याख्यानात कवी अनिल जाधव यांचे प्रतिपदन*

*दर्पण प्रबुद्ध ग्रंथालयातर्फे आयोजन*

*कणकवली ः   प्रतिनिधी*

कविवर्य आ. सो. शेवरे यांच्या कवितेत मानवी एकूण कल्याणाचाच विचार. शेवरे यांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यात वाटचाल करताना, सामाजिक काम करताना आणि कवितेतूनही व्यवस्थेलाच प्रश्न विचारले. त्यामुळे शेवरे व्यक्ती आणि त्यांचे साहित्य असे वेगळे करता येत नाही.असे प्रतिपादन कवी आणि चळतील प्रसिद्ध कार्यकर्ते अनिल जाधव यांनी केले.
दर्पण प्रबोधनी सिंधुदुर्ग प्रबुद्ध ग्रंथालयातर्फे ‘कविवर्य आ.सो. शेवरे व्यक्ती आणि वाड:मय’ या ग्रंथावर कवी जाधव यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले.यावेळी जाधव यांनी शेवरे यांना वगळून कोकणातील परिवर्तन साहित्याचा लढा पूर्णच होऊ शकत नाही. असेही आग्रहाने सांगितले
या व्याख्यानात बोलताना श्री जाधाव म्हणाले, आ. सो. शेवरे व्यक्ती आणि वाड:मय या ग्रंथात मराठी साहित्यातील मान्यवर लेखक कवी शेवरे यांच्या लेखनाचा आढावा घेतला आहे. यात ज्येष्ठ समीक्षक मोतीराम कटारे म्हणतात, माणसावर सुक्त रचण्याची भाषा ही गोलपीठातून नामदेव ढसाळ यांनीही केली होती.परंतु नामदेव यांचा कवितासंग्रह हा विध्वसंक विद्रोहाचे प्रतिक असून आसोंचा गंधारीची फुले काव्यसंग्रह विधायक विद्रोहाचा आविष्कार आहे.कवीने स्वत:ला बुद्धाशी जोडुन घेतले आहे.ज्यांनी अन्याय केलेत त्यांच्यासह सर्वांना माणुस म्हणुन माणसासारखे वागविण्याची प्रतिज्ञा करण्याचे आवाहनही कवी करतो.निसर्ग व माणुस यांचा समन्वय साधणारी शेवरेंची कविता आहे .त्यांच्या दफणवेणा व गंधारीची फुले या कवितासंग्रहातून निसर्गाचा स्वर व आदर्शाचा प्रत्यय येतो.नामदेव ढसाळांचा गोलपीठा हा महानगरीय परिघातील वंचितांचा अवकाश आहे. तर गंधारीची फुले हा ग्राम्य परिघातील वंचितांचा अवकाश आहे. निसर्गातील वैविधता,अपरंपार बदलत जाणारी नक्षत्रे व समाजातील निरंतर व समाजातील निरंकार हारागिरी पाहुन कवीची सर्जनता दाहक वास्तवावर फुंकर घालते.
या ग्रंथात शेवरेंच्या कवितेतील प्रतिमाविश्व कवी डॉ.गोविंद काजरेकर यांनी उलगडले आहे.यात काजरेकर म्हणतात, गंधारीची फुले,दफणवेणा, झिरो बेलंस असलेले माझ पासबुक ही कवितासंग्रहाची शीर्षके प्रतिमा म्हणुन येतात.ही सर्वकष अभावाची प्रतिमा म्हणुन कवितेतुन येते.अंधाराचा छेद देण्यासाठी शेवरे यांनी बऱ्याच कवितेत प्रकाशाची प्रतिमा योजिली आहे.उदा.
तुझ्या चितेच्या उजेडात मी
कविता वाचली माणसांच्या
कहाण्यांची.तेव्हा वेदनेची पाखरे सहज उडुन गेली सरणावरून. तर या ग्रंथात शेवरेंच्या कवितेतील अनेक अंधाररुपे डॉ.अनिल फराकटे यांनी दर्शविली आहेत.ते म्हणतात, त्यांची पुर्ण कविता अंधार प्रतिमा घेऊन येते.तर कष्टकरी स्त्रिजीवन प्रा.सीमा हडकर तांबे यांनी रेखाटले आहे.सोशिक व स्वाभिमानी स्त्रीया त्यांच्या कवीतेत दिसतात.
या ग्रंथाच्या दुसऱ्या भागात गंधारिची फुले कातळावर फुलेली कविता–जेष्ठ कवी मनोहर कदम, दफनवेणा परिवर्तनाची गतिशीलता दर्शविणारी कविता-काशीनाथ वाडेकर,माणसाचे गीत गाणारी कविता- महेंद्र भवरे,आपल्या वाटा प्रकाश वाटा आहेत ठामपणे सांगणारा -प्रकाश मोगले, समकालाच्या परिभाषेत व्यक्त झालेला काव्यसंग्रह झिरो बेलंस
आसोंची अंधारातील जागल्या
प्रतिकात्मक कविता बौद्ध
परिमाणकारक आहेत- नारायण लाळे,तर वृत्तवेध भागात नारायण सुर्वे ते अजय कांडर अशा सर्व मान्यवरानी आसोंच्या व्यक्तिमत्व रेखाटले आहे.चरित्रवेध मध्यें संध्या तांबे यान यांच्या पासून दिपक कोर्लेकर यांच्यापर्यंत लोकांनीं अपरिचित घटनांचा परामर्श घेतला आहे.त्यामुळेच कोकणातील ज्येष्ठ दिवंगत कवीवर असा पहिलाच हा सर्व स्पर्शी आढावा घेणारा व्यक्ती ग्रंथ असल्याचेही आग्रहाने शेवटी जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!