*कोंकण एक्सप्रेस*
*विद्युत पुरवठा कर्मचाऱ्यांना जनतेच्या पैशातूनच पगार दिला जातोय याचा भान ठेवून अधिकाऱ्यांनी आपल्या अक्त्यारीतील सेवा नियमात राहून पूर्ण कराव्या– अमित वेंगुर्लेकर*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा विभाग सावंतवाडी येथील विद्युत पुरवठा प्रशासन दिवसातून कित्येक वेळा वीज पुरवठा खंडित करत असल्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत .
सावंतवाडी तालुक्यातील असा एकही प्रभाग संबंधित प्रशासनाने आपल्या नियमात राहून सुस्थितीत केलेला नाही,यामागचे कारण म्हणजे हवालदिल अधिकारी विद्युत पुरवठा प्र वाहात वापरण्यात येणाऱ्या सामग्रीचे परीक्षण करणे त्यामागचे प्रत्येकी साहित्य सामग्रीचे मुदत मर्यादा तपासून वेळीच तेथील साहित्याची अदलाबदल करणे त्यामागचे प्रत्येकी लेखी अहवाल आपल्या वरिष्ठांकडे प्रसिद्ध करणे गरजेचे असते परंतु या बाबत ग्राहक सेवा न बजावता विद्युत पुरवठा प्रवाहाच्या आजूबाजूची निगाही याच्या माध्यमातून करण्यात येत नाही,परिणामी अचानक विद्युत पुरवठा खांब कोसळणे,प्रवाह वाहिन्यांवर झाडं कोसळणे, विद्युत तारांच्या दरम्यात चुकीच्या अंतरावर खांब उभे केल्यामुळे, विद्युत वाहिन्याचा वारंवार हवेच्या दाबामुळे एकमेकांना स्पर्श होऊन आग पेटणे, फ्यूज जळणे एकच डी पी वरून( तुज माज) साटेलोटे करत अनधिकृत वीज पुरवठा मीटर जोडणी देणं अशा आणि यापेक्षा ही अनेक करामती या वरिष्ठ अधिकाऱ्यांना करायला वेळ असतात पण वीज पुरवठा ग्राहकांना वेळेत सेवा देताना मात्र यांचे दूरध्वनी अचानक बंद होतात कामगार नसतात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी पुरेस साहित्य नसत पण वीज बिल वसुली करीता मात्र यातील प्रत्येक कर्मचारी आपल्या घरातील जबाबदारीच काम असल्यासारखे रुबाब दाखवतात दिनांक ०६/०५/२०२५ दुपारच्या वेळी न्यू खासकिलवाडा शिल्प ग्राम रोड येथे अचानक विद्युत पुरवठा प्रवाहावरच झाडं कोसळलं एकूण दहा घरांचा वीज पुरवठा खंडित झाला अधिकारी हवालदिल कर्मचारी दोन तासानंतर फक्त पाहणी करण्यासाठी येतात हेच झाड जर यांच्या वीज पुरवठा विभागाच्या कार्यालयावर पडलं असत तर?
प्रत्येक वीज ग्राहकाला वीज खंडित झाल्यास वेळीच पुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक असून सुद्धा वरिष्ठ अधिकारी आपल्या अकत्या रीतीतील कामांपक्षा जास्त वेळ आपल्या घरी देत असतील तर याची तातडीने दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात यावी अशी लेखी मागणीही सन्माननीयआमदार श्री. दीपक भाई केसरकर साहेब तसेच सन्माननीय पालकमंत्री श्री. नितेशजी राणे साहेब याच्याकडे करणार असल्याचे अमित वेंगुर्लेकर यांनी पत्रकार माध्यमातून म्हटले आहे .
तसेच सावंतवाडी शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी याबाबत अनेक वेळा आवाज उठवला होता परंतु याच अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेवर खोटे कायदेशीर गुन्हे दाखल करून आपली बाजू सरस असल्याचे खोटे आणि काल्पनिक चित्र सावंतवाडी वासियांच्या मनात भीतीसाठी उभे केले होते आणि याचाच भुर्दंड आज सर्वसामान्य नागरिकांना या वीज कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अनुभवायला मिळत आहे. भर उन्हाळ्यात ही सेवा देताय मग पावसाळ्यात का होईल याचाही विचार होण गरजेचंच!!याबाबत सबंधित जबाबदार प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कामचुकार व बेजबाबदार वीज पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने सावंतवाडी मधून अन्य ठिकाणी बदली करण्यात यावी अशी मागणी मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन तर्फे प्रदेश सचिव श्री अमित वेंगुर्लेकर यांनी पत्रकार माध्यमातून केली आहे