*कोंकण एक्सप्रेस*
*सर्व बांगलादेश व पाकिस्तानी प्रेमी, जिहादी विचारसरणीच्या देशद्रोहींनी आमच्या देशाची एकता अखंडता भंग करण्यापेक्षा, आमचा देश सोडून जावे*
*हिंदू एकता मंच,बांदा*
देशावर निस्सिम प्रेम करणारे देशप्रेमी म्हणून व आमची देशाप्रती असलेली जबाबदारी ओळखत हिंदू एकता मंच,बांदा आम्ही जाहीर करतो की,
ज्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी पहेलगाम येथे देशाच्या आत्म्यावर झालेल्या हल्ल्याला ताबडतोब प्रतिसाद देत सर्व पाकिस्तानी व्हीजाधारक व नागरिक यांना भारत सोडण्याचे आदेश दिले. त्यालाच साथ देत काल ज्याप्रमाणे सावंतवाडी व बांदा येथे घटना घडल्या त्या पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाच प्रकारचे अजून कोणी, कोणत्याही धर्माचे पाकिस्तान व बांगलादेश प्रेमी राहत असतील तर आम्ही जाहीर करतो की, त्या सर्व बांगलादेश व पाकिस्तानी प्रेमी, जिहादी विचारसरणीच्या देशद्रोहींनी आमच्या देशाची एकता अखंडता भंग करण्यापेक्षा, आमचा भारत देश सोडून पाकिस्तान व बांगलादेशात निघून जावे. त्याकरिता येणारा सर्व खर्च हिंदू एकता मंच तर्फे करण्यात येईल. तसेच त्यांनी पुन्हा कधीही आमच्या देशात पाय देखील ठेऊ नये. परंतु आम्ही स्पष्टपणे सांगतो की, एकदा सरकारने दिलेली डेडलाईन/ मुदत संपल्यानंतर जर कोणी पाकिस्तानी किंवा बांगलादेशी आम्हाला बांदा अथवा परिसरात सापडला तर मात्र कसलीही गय न करता, दयामाया न दाखवता आमच्या पद्धतीने योग्य इलाज करून त्याला परत पाठवण्यात येईल हे ध्यानात ठेवावे. इथे राहून आमच्या देशाची बदनामी व देशविघातक कृत्ये आम्ही कदापी सहन करणार नाही हे ध्यानात ठेवावे.
हिंदू एकता मंचच्या वतीने,
श्री.निलेश सावंत, माजी सैनिक
श्री गुरु कल्याणकर, सामाजिक कार्यकर्ते