*उष्णतेची लाट आणि गारपिटीचा धोका राज्यातील 15 जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट*

*उष्णतेची लाट आणि गारपिटीचा धोका राज्यातील 15 जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट*

*कोंकण एक्सप्रेस*

*उष्णतेची लाट आणि गारपिटीचा धोका राज्यातील 15 जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट*

महाराष्ट्रात हवामान बदलाचा मोठा फटका (hailstorms)बसणार असून, राज्यात 24 एप्रिलपासून उष्णतेच्या लाटेसोबतच गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने राज्यातील 15 जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागानुसार, 24 एप्रिल रोजी अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, विशेष कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाडा भागांमध्ये यलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून, तापमानात 2-3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!