*कोंकण एक्सप्रेस*
*अखेर MNGL च्या विरोधात दोडामार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल..*
*दोडामार्ग /शुभम गवस*
नियम बाह्य रस्त्याच्या साईडपट्टीवर खोदकाम केल्या प्रकरणी MNGL कंपनीच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाने तक्रार दाखल केली आहे. काल सकाळी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी तसेच मणेरी सरपंच यांसह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनि मणेरी येथे जात पुलानजिक पाहणी केली.
मणेरी येथे MNGL चे भूमिगत पाईप लाईन टाकण्याचे काम सूरू आहे, सदर काम करण्यासाठी बांधकाम विभागाने काही अटी व शर्थी ठरवून दिल्या आहेत, त्याठिकाणी काम करत असलेला ठेकेदार सर्व नियम धाब्यावर बसवून खोदकाम करत आहे, सदर कामाची रविवारी सकाळी स्वराज्य सरपंच सेवा संघटना जिल्हा अध्यक्ष प्रविण गवस यांनी पाहणी केली आणि ते काम नियमबाह्य आहे अशी विचारणा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संभाजी घंटे यांच्याकडे केली त्यावेळी त्यांनी सदर काम नियम बाह्य असल्याचे सांगितले त्यामुळे सदर ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वराज्य सरपंच सेवा संघटना जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांनी केली असून “ते” काम तात्काळ बंद करावे, आणि सदरचे खोदकाम तीन दिवसांत पूर्ववत करून रस्ता सुस्थितीत करण्याचे नोटीस संबंधित MNGL च्या ठेकेदाराला देण्यात आली तर पोलीस ठाणे दोडामार्ग यांना तीन दिवसात रस्ता व साईड पट्टी दुरुस्त न केल्यास गुन्हे दाखल करण्याचे पत्र दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मणेरी पुलानजीक MNGL चे भूमिगत पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे, सदर काम नियमबाह्य असल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्धी माध्यमातून येतं होत्या, यावर सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांनी स्थानिक सरपंच व बांधकाम विभागाचे अधिकारी यांसह संयुक्त पाहणी केली. यावेळी मोजमापे देखील घेण्यात आली, सदरचे काम हे नियम बाह्य आहे, मुजोर ठेकेदार कोणालाही जुमानत नसल्याचे बांधकाम चे अधिकारी म्हणाले, यावर प्रविण गवस यांनी सदरचे काम तात्काळ बंद करा आणि यांच्यावर सरकारी जागेवर अतिक्रमण वं नासधूस केली म्हणून कारवाई करा असे सांगितले, यानुसार बांधकाम विभागाने कारवाईचे पत्र पोलीस ठाणे दोडामार्ग व काम बंद करण्याचे पत्र MNGL च्या मुजोर ठेकेदाराला दिले.
* मुजोर ठेकेदाराना त्यांची जागा दाखवू : प्रविण गवस *
यावेळी बोलताना सरपंच सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रविण गवस यांनी अश्या मुजोर ठेकेदारवर कारवाई व्हावी तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान टळावे यासाठी सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून आक्रमक भुमिका घेवू व अश्या ठेकेदारांना त्यांची जागा दाखवू, ज्या रस्त्यासाठी अनेक आंदोलने झाली त्यावर आज असे मुजोर ठेकेदार नांगर फिरवताहेत हे बघून वाईट वाटतं त्यामुळे तालुक्यातील लोकप्रतिनिधिंनी यावर आवाज उठवणे गरजेचे असल्याचे श्री गवस म्हणाले.