*कोकण Express*
*दहावी, बारावीच्या विध्यार्थ्यांना अर्धातास जादा वेळ मिळणार!*
पासिंग गुणांमध्ये बदल नाही
*सिंधुदुर्ग*
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. या विध्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी तीन तासांच्या पेपर साठी अर्धा तास अधिक वेळ तर दोन तासांच्या पेपर साठी पंधरा मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे. तसेच परीक्षा ऑफ लाईन पद्धतीनेच होणार आहे.सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ही परीक्षा ऑन लाइन की ऑफ लाईन होईल यांबाबत संभ्रम पालक व विध्यार्थी यांच्या मध्ये होता. याला आता विराम मिळाला आहे. विध्यर्थाना त्यांच्याच शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र असणार आहे.
परिक्षेसाठीच्या पासिंग साठी ३५ टक्के गुण मिळविणे आवश्यक असणार आहे यामुळे पासिंग गुणांमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्या विद्यार्थ्याला कोरोना लक्षणे आढळली आणि त्याला परीक्षा देता न आल्यास अशा विध्यार्थ्यांची जून महिन्यात विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. विध्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुद्धा लेखी परिक्षे नंतर घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.