*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड जामसंडे शहराचा पाणीप्रश्न पेटला!*
*नागरिकांनी नगरपंचायतीला धडक देत नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांना धरले धारेवर*
*चार दिवसांत तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
वारंवार उद्भवणारा देवगड जामसंडे शहराचा पाणीप्रश्न अखेर पेटला. पाणीप्रश्नावर आक्रमक झालेल्या देवगड जामसंडेमधील व्यापारी व ग्रामस्थांनी गुरूवारी न.पं. कार्यालयावर धडक देत नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांना जाब विचारला. पाणीप्रश्न सुटत नसेल तर नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करा या मागणीवर व्यापारी व ग्रामस्थ ठाम राहीले. नळयोजना दुरूस्तीसाठी ९ कोटी २१ लाख रूपये रकमेला तांत्रिक मान्यता मिळाली मात्र पुढे काय झाले? पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटत नसेल तर घरपट्टी, पाणीपट्टी नागरिकांकडून घेत असाल तर पाणी द्यायची जबाबदारी नाही का? असा प्रश्नांचा भडीमार करीत पाणी, कचरा, सांडपाणी या प्रश्नांवरून धारेवर धरले. अखेर मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी चार दिवसात पाणीपुरवठा करण्याबाबत नियोजन करतो व पाणीप्रश्नावर तोडगा काढतो असे आश्वासन दिले.पाणीप्रश्नावर चार दिवसात तोडगा न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम यांनी दिला.
देवगड जामसंडेचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर वळणावर असून पाईपलाईन फुटणे नित्याचेच झाले आहे.तर आता पाण्याची पातळी घटत असल्याने एप्रिलपासून दोन दिवस आड पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाली आहे.देवगड जामसंडेचा महत्वाचा असलेला पाणीप्रश्न अखेर पेटला.या प्रश्नावर आक्रमक झालेल्या व्यापारी व ग्रामस्थांनी थेट न.पं.कार्यालयावर धडक दिली व नगराध्यक्षा मुख्याधिकारी यांना जाब विचारला.यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत, मुख्याधिकारी सुरज कांबळे, नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी तर व्यापारी व ग्रामस्थांच्यावतीने देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, सौ.प्रियांका साळसकर, अॅड.कौस्तूभ मराठे, चारूदत्त सोमण, मधुकर नलावडे, ज्ञानेश्वर खवळे, बाळा लळीत, रqवद्र तारकर,दयाळ गावकर, उल्हास मणचेकर, दयानंद पाटील, विजय कदम, आनंद कुळकर्णी, आप्पा अनभवणे, अविनाश उर्फ राजू सावंत,चंद्रहास मर्गज, आनंद रामाणे, गिरीश धोपटे, रqवद्र कोयंडे, शामसुंदर खेडेकर,धर्मराज जोशी, निलेश कारेकर, नगरसेवक व्ही.सी.खडपकर आदी उपस्थित होते.
पाणीप्रश्न गेली कित्येक वर्षे सुरू आहे.आता हा प्रश्न गंभीर बनला असून ज्या दहिबांव नळयोजनेवरून पाणीपुरवठा केला जात आहे ती योजनाच ३० वर्षापुर्वीची असून ती जीर्ण झाली आहे यामुळे वरचेवर पाईपलाईन फुटून पाणीप्रश्न गंभीर होत आहे.या नळयोजनेच्या दुरूस्तीसाठी ९ कोटी २१ लाख रूपये रकमेला तांत्रिक मान्यता मिळाली पण पुढे काय झाले? निधी मंजुर होवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात कधी होणार? असा सवाल व्यापारी व ग्रामस्थांनी केला.न.पं.प्रशासनाकडून दोन दिवस आड करून पाणीपुरवठा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात चार चार दिवसातून पाणीपुरवठा होतो.नागरिकांना कायम मोबाईल घेवून पाणी कधी येणार हे मेसेजची वाट पाहावी लागते.पाणीप्रश्न एवढ्या गंभीर वळणावर असल्याने व त्याबाबत गेली कित्येक वर्षे कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने देवगड जामसंडेमधील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करा अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थांनी लावून धरली.उद्यापासुन टँकरने पाणीपुरवठा करा अशी मागणी विजय कदम, बाळा लळीत यांनी केली.घरपट्टी, पाणीपट्टी भरून घेता मग नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी न.पं.ची नाही का असा सवाल ग्रामस्थांनी केला.यावेळी शैलेश कदम, विजय कदम, ज्ञानेश्वर खवळे, दयाळ गावकर, सौ.प्रियांका साळसकर, रवीद्र तारकर, शामसुंदर खेडेकर, आनंद रामाणे, आनंद कुळकर्णी, चारूदत्त सोमण, उल्हास मणचेकर, आप्पा अनभवणे,चंद्रहास मर्गज आदींनी प्रश्नांची सरबत्ती करून नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना धारेवर धरले.
नगरसेवक बुवा तारी यांनी कोर्ले सातंडी धरणावरून नवीन योजना प्रस्तावित केली असून त्याचा पाणी आरक्षणाचा दाखला मिळाला आहे अशी माहिती दिली. यावेळी नवीन योजना कार्यान्वित होण्यास बराच कालावधी जाईल तोपर्यंत देवगड जामसंडेवासियांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी काय उपाययोजना केली आहे. तसेच योजनेच्या दुरूस्तीसाठी आतापर्यंत झालेला खर्च व साठवण टाक्या किती आणि वेळवाडी येथे उभारलेली साठवण टाकी वरून पाणीपुरवठा का होत नाही याबाबतची माहिती द्यावी अशी मागणी केली. यावेळी पाणीपुरवठा विभागामार्फत वेळवाडी साठवण टाकीचे काम २०२० साली पुर्ण झाले मात्र टाकीपर्यंत पाईपलाईनचे काम झालेले नाही अशी माहिती दिली. दहिबांव नळयोजनेवरून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत शिरगाव पाडाघर योजनेवरून पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करा अशी सुचना आप्पा अनभवणे यांनी केली. यावेळी पाणीपुरवठा विभागाकडून चारू पारकर यांनी दहिबांव नळयोजनेची पाईपलाईन पुर्णत: खराब झाली असून उष्म्यामुळे पाणीपातळी घटत आहे यामुळे २० जुनपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी एक दिवस आड ऐवजी दोन दिवस आड करून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शिरगाव पाडाघर योजनेवर देवगड जामसंडेसहीत ११ गाव आहेत.उर्वरीत ९ गाव पाणीबील भरत नाहीत.फक्त देवगड जामसंडे शहराची पाणीपट्टी पुर्णत: भरलेली आहे.मात्र तेथून पाणीपुरवठा देवगड जामसंडेसाठी केल्यानंतर वॉल फिरवुन पाणी चोरी केली जाते यामुळे या योजनेवरून एक थेंब पाणी मिळत नाही हे सांगीतले.यावर न.पं.प्रशासन म्हणून पाणी चोरी करणाèयांवर कोणती कारवाई केली, पोलिस तक्रार का केली नाही.पाणी बील पुर्ण भरणाऱ्यांना पाणी नाही व पाणीबील थकीत ठेवणाऱ्या गावांना पाणी मिळते हा कसला न्याय असा संतप्त सवाल व्यापारी व ग्रामस्थांनी केला. न.पं.प्रशासन ठेकेदाराकडे बोट दाखविते तर ठेकेदार ३५ लाख रूपये येणे असल्याचे सांगत आहे हा काय प्रकार असा सवाल उल्हास मणचेकर यांनी केला. पाणीप्रश्न सुरळीत होत नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करा या मागणीवर ग्रामस्थ व व्यापारी ठाम राहीले. यावेळी अॅड.कौस्तुभ मराठे यांनी टँकर ऐवजी अग्निशामक बंब याचा वापर पाणीपुरवठा करण्यासाठी करावा अशी सुचना केली. यावर नगरसेवक बुवा तारी यांनी न.पं.कडे असलेल्या टाक्यांद्वारे पाणीपुरवठा करता येईल असे सांगीतले.यावर मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी चार दिवसात पाणीपुरवठा करणेबाबत नियोजन करून पाणीप्रश्नाबाबत तोडगा काढू असे आश्वासन दिले.
देवगडमधील कचऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे याकडेही ग्रामस्थ, व्यापाèयांनी लक्ष वेधले. यावेळी मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी कचरा डंपींग करण्यासाठी देवगड जामसंडेमध्ये नागरिकांकडून विरोध केला जातो.जागा निश्चित केल्यानंतर त्या ठिकाणी कचरा डंपींग करण्यास विरोध केला जातो यामुळे बाहेरील गावातील नागरिकही त्यांचा गावात कचरा डंपींग करण्यास जागा देत नसून शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात कचरा डंपींग ग्राऊंडसाठी जागा आरक्षित केली आहे हा आराखडा मंजुर झाल्यानंतर कचरा डंपींगचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असे सांगीतले.मासळी विक्रेत्या महिला मासळी विक्रीसाठी रस्त्यालगत बसत असल्याने अपघात होतात याकडेही लक्ष वेधले यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी त्यांच्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली मात्र त्या ठिकाणी महिला बसत नाहीत असे सांगीतले यावेळी रस्त्यालगत मासळी विक्री करणाèया महिला विक्रेत्यांवर कारवाई करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.रqवद्र तारकर यांनी देवगड जामसंडे शहरात बोअरवेलचे प्रमाण वाढल्याने विहीरींच्या पाण्याची पातळी घटत आहे याकडे लक्ष वेधले.पाणी,कचरा, सांडपाणी हे प्रश्न गंभीर बसले आहेत मात्र जनता गप्प आहे असे यापुढे गृहीत धरू नका असे उपस्थित ग्रामस्थ व व्यापारी यांनी ठणकावून सांगीतले.