कट्टा येथील वराडकर हायस्कुल येथे सखी सावित्री समितीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी आयुर्वेद व्यासपीठ सिंधुदुर्गच्या प्रतिनिधी आयुर्वेदाचार्य वैद्य सौ. रुपाली दिवाकर पंतवालावलकर यांचा ‘कळी उमलताना’ हा व्याख्यानात्मक कार्यक्रम संपन्न

कट्टा येथील वराडकर हायस्कुल येथे सखी सावित्री समितीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी आयुर्वेद व्यासपीठ सिंधुदुर्गच्या प्रतिनिधी आयुर्वेदाचार्य वैद्य सौ. रुपाली दिवाकर पंतवालावलकर यांचा ‘कळी उमलताना’ हा व्याख्यानात्मक कार्यक्रम संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*कट्टा येथील वराडकर हायस्कुल येथे सखी सावित्री समितीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी आयुर्वेद व्यासपीठ सिंधुदुर्गच्या प्रतिनिधी आयुर्वेदाचार्य वैद्य सौ. रुपाली दिवाकर पंतवालावलकर यांचा ‘कळी उमलताना’ हा व्याख्यानात्मक कार्यक्रम संपन्न*

*मालवण ः प्रतिनिधी*

भारतीय संस्कृतीत आहार आणि विहार यांचा गहन असा संबंध आहे. संतुलित आहार आणि शारीरिक मानसिक वावर यामुळे जीवन अधिक सुखी आणि शांतीपूर्ण होते. त्यामुळे आहार विहार हे फक्त शारीरिक अन्न किंवा क्रिया नाही तर एक मानसिक आणि आत्मिक शुद्धतेचा भाग आहे, म्हणूनच जीवनात आहार आणि विहाराचे महत्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी त्यादृष्टीने वाटचाल करावी, ज्यायोगे जीवन अधिक आनंदादायी आणि शांतीपूर्ण बनेल असे प्रतिपादन मालवणच्या सुप्रसिद्ध वैद्य आयुर्वेदाचार्य सौ. रुपाली दिवाकर पंतवालावलकर यांनी येथे बोलताना केले.

कट्टा येथील वराडकर हायस्कुल येथे सखी सावित्री समितीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी आयुर्वेद व्यासपीठ सिंधुदुर्गच्या प्रतिनिधी आयुर्वेदाचार्य वैद्य सौ. रुपाली दिवाकर पंतवालावलकर यांचा ‘कळी उमलताना’ हा व्याख्यानात्मक कार्यक्रम पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, सखी सावित्री समितीच्या अध्यक्षा सौ. श्रद्धा नाईक, कार्यवाह सौ. चांदरकर, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर, पर्यवेक्षक महेश भाट, कट्टा वरची गुरामवाडी ग्रा. पं. सदस्या मयुरी कुबल सौ. साधना गावडे, समृद्धी गरुड, प्रमिता पवार, स्मिता राजेश परब, श्रुती राजेश परब, मेघा सातार्डेकर, नेहा पावसकर, संजना भात्यड्ये, मृणाल मलये आदी व इतर उपस्थित होते.

प्रारंभी मुख्याध्यापक सौ. देवयानी गावडे यांनी प्रास्ताविक केले. तर सौ. सिमरन चांदरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी समाजात प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत यश संपादन केलेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी वैद्य रुपाली पंतवालावलकर यांनी किशोरवयीन मुलींमध्ये होणारे बदल त्याबद्दल आवश्यक जागरूकता आणि अशावेळी पालकांनी , विशेषता विशेषतः माता पालकांनी कोणती दक्षता घ्यावी व या नव्या कळ्यांचे उमलणे कसे सुकर व्हावे याबाबत तसेच योग्य आहार विहार या बाबत मार्गदर्शन केले. तसेच या विषयावर पालक व विद्यार्थिनींशी संवाद देखील साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वीणा शिरोडकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!