*कोकण Express*
*फोंडाघाट येथील कातकरी आदीवासींच्या पुनर्वसनाच्या लढाईला मिळणार यश…*
*दलित आदिवासी हक्क संघर्ष समितीचा पाठपुरावा..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली फोंडाघाटात कातकरी आदीवासींवरील अत्याचाराविरोधात या महिन्यात ॲट्राॕसिटीची घटना घडली होती.गुन्हा दाखल झाला,वनअधिकारी निलंबितही झाले आहेत.पण या कातकरी बांधवांना सरकारने जनावरासारखा जीवन जगायला बाध्य केले आहे.ना घर ना पाणी,ना वीज ना रस्ता.ॲट्रासिटीच्या निमित्ताने ही लढाई या मूलभूत मूद्यांवर वळवायची भूमिका दलित आदिवासी हक्क संघर्ष समितीने व सत्यशोधकांनी घेतली, यात मोर्चाही आयोजित केला होता. पण प्रांताधिका-यांनी मोर्चा मागे घेण्याची विनंती करून चर्चेला बोलावले.त्यानुसार कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.या बैठकीत कातकरी पुनर्वसनाबाबत सकारात्मक चर्चा झाली,काही महिन्यांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन प्रांताधिकारी यांनी दिले आहे.
या बैठकीलाय तहसिलदार रमेश पवार,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण ,वीज अभियंता बाळासाहेब मोहिते, वन अधिकिरी सत्यवान सुतार,सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे,पोलीस उपनिरीक्षक श्री. लाड,प्रमोद पालकर,दलित आदिवासी हक्क संघर्ष समितीचे निमंत्रक अंकुश कदम , समता प्रतिष्ठान सिंधुदुर्ग अध्यक्ष कॉ.अमोल कांबळे, अँड.सुदीप कांबळे,कातकरी बांधव उपस्थित होते.
कणकवली प्रांतअधिकारी यांच्या सोबत झालेल्यां चर्चेत कातकरी बांधवांनाच्या समस्या सोडविण्यावर चर्चा झाली. त्यांना पाणी,वीज,रस्ता,घरे,आरोग्य तपासणी,गावठाण वसवणे आदी मुद्द्यांवर चर्चा होवून निर्णय झाले.यामध्ये तात्पुरती पाण्याची व्यवस्था ताबडतोब करतो आहोत व कायमस्वरुपी व्यवस्था १५ एप्रिलपर्यंत करायचे नियोजन करण्यात येईल असे प्रांताधिका-यांसोबत अडीच तास झालेल्या चर्चेत प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी आश्वासन दिले.
यावेळी दलित आदिवासी हक्क संघर्ष समितीचे निमंत्रक अँड.सुदीप कांबळेने चर्चेचे नेतृत्व केले. यात कातकरी बांधवाना गावठाण वसवुन पुनर्वसनासाठी ५ एकर जमीन मागणीची मागणी करण्यात आली.