*कोकण Express*
*पटवर्धन चौक ते कलमठ पोलिस स्टेशन पर्यंत वाहनं सोडाच पण चालणेही मुश्किल…*
*अशोक नाईक – खरी गरज कणकवली-आचरा बायपास रस्त्याची…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील आचरा रोड ते गांगो मंदिर पर्यंतच्या रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच आमदार नितेश राणे साहेब यांचे शुभहस्ते फीत कापून पार पडले. त्याबद्दल आमदार साहेब आणि कणकवली नगरपरिषदेचे त्रिवार अभिनंदन!
आता कलमठ मार्गे येण्या-जाणारया रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, मुंबई कडील वाहनांची नाक्यावरील वर्दळ कमी होण्यास नक्कीच मदत होईल. मात्र आता टाॅकीज समोर सिग्नल यंत्रणा किंवा वाहतूक पोलीस ठेवणं गरजेचं आहे.
आता खरी गरज आहे ती नियोजित कणकवली-आचरा बायपास रस्त्याची! हा रस्ता गेली कित्येक वर्षे रखडलेला आहे. त्यामुळे पटवर्धन चौक ते कलमठ पोलिस स्टेशन पर्यंत वाहनं सोडाच पण चालणेही मुश्किल बनलय!