*कोकण Express*
*’बहिणाबाईच्या लेकी’ कवयित्री संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री अनुपमा उजगरे*
*समाज साहित्य संघटना, नाथ पै सेवांगणचे 28 रोजी आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गतर्फे सातत्याने विविध साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. सिंधुदुर्गातील साहित्यिकांना मंच उपलब्ध व्हावा या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील कवयित्री यांच्या सहभागाने ‘बहिणाबाईच्या लेकी’ या कविसंमेलनाचे नाथ पै सेवांगण मालवणच्या संयुक्त विद्यमाने रविवार 28 फेब्रुवारी रोजी सायं. 7 वाजता ऑनलाइन आयोजन करण्यात आले असून कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी मुंबई येथील ज्येष्ठ कवयित्री अनुपमा उजगरे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक समाज साहित्य संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड.देवदत्त परूळेकर यांनी दिली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडच्या काळात सातत्याने साहित्य लेखन करणाऱ्या साहित्यिकांची संख्या वाढत आहे. यात महिलांचाही सहभाग आहे. विशेषतः यात कविता लिहिणाऱ्यांची संख्या जास्त आहे. स्थानिक पातळीवर गुणवत्तापूर्ण लेखन करणाऱ्या कवयित्रींना मंच उपलब्ध व्हावा या पार्श्वभूमीवर :बहिणाबाईंच्या लेकी’ हे कवयित्री संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवियत्री अनुपमा उजगरे यांची निवड करण्यात आली असून श्रीमती उजगरे या गेली पन्नास वर्षे निष्ठेने काव्यलेखन करत आहेत. मराठीतील एक प्रमुख कवयित्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले असून ललित लेखिका म्हणूनही त्यांची नावलौकित आहे तसेच अनेक प्रतिष्ठित काव्य पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील ज्येष्ठ कवियत्री संध्या तांबे यांच्या कवितेचे वाचन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार असून या कविसंमेलनात कविता वाचनासाठी संध्या तांबे यांच्यासह कल्पना बांदेकर, श्वेतल परब, सुचिता गायकवाड, सरिता पवार, शालिनी मोहोळ, मनीषा पाटील, नीलम यादव, प्रमिता तांबे, ऍड. मेघना सावंत आदींचे कवितावाचन होणारा आहे अधिक माहितीसाठी संपर्क- सरिता पवार( 96046 55844 )
सचिव-समाज साहित्य संघटना.