*कोंकण एक्सप्रेस*
*कोकण भूमी जपण्यासाठी, विकण्यासाठी नाही!…शिमगोत्सवात दिला अनोखा संदेश..*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
‘परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण भूमी पूर्वजांनी जपण्यासाठी दिली आहे, विकण्यासाठी नाही..शबय! शबय!! शबय!!!‘ अशा प्रकारचा अनोखा पण महत्त्वाचा संदेश दाभोली येथील ग्रामस्थांनी आपल्या शिमगोत्सवाप्रसंगी दिला.
निसर्गसौंदर्याने संपन्न असलेल्या कोकण भूमीवर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वाडवडिलांनी मेहनतीने एक एक पैसा जमवून आपल्या पुढील पिढीसाठी ही जमिन घेऊन ठेवली आहे. त्यांनी हा ठेवा विकण्यासाठी नाही तर जपण्यासाठी ठेवला आहे. या भूमितच काबाडकष्ट केले तर पिढ्यान पिढ्याचे भले होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत जमिन विकून चालणार नाही हे आत्ताच्या तरूण पिढीच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच त्यांनी शिमगोत्सवाच्या माध्यमातून येणा-या जाणा-यांमध्ये याची जनजागृती केली