*कोंकण एक्सप्रेस*
*वायरी बांध येथे स्वामी समर्थ जयंती उत्सव*
*मालवण : प्रतिनिधी*
वायरी बांध – तारकर्ली येथे अक्कलकोट स्वामी समर्थ जयंती उत्सव दि. ३१ मार्च रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी १० ते १ वा. पर्यंत स्वामी समर्थांच्या कथांचे वाचन व प्रवचन, दु.१ वाजता महाआरती, १ वाजल्यानंतर महाप्रसाद, तीर्थप्रसाद, सायं. ५ वा. भक्ती स्वरगंधाचे भक्तीसंगीत, सायं. ७ ते ८.३० वा. विनोद सातार्डेकर यांचे कीर्तन, रात्री ९ वाजता भालचंद्र केळुसकर यांचे भजन होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गणपत तारी तसेच संयोजक राजेश व सुजित बंधू यांनी केले आहे.