कोंकण एक्सप्रेस
बदलत्या हवामानाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू पिकाला..
वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके
बदलत्या हवामानाचा फटका तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू पिकाला बसला असून मागील तीन दिवस सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्या मुळे हाता तोंडाशी आलेल्या काजू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे . वादळाने कोवळे काजू बी, आंबा गळून पडल्यामुळे झाडांखाली अक्षरशः पानांचा तसेच कोवळ्या काजू बी, व आंब्यांचा खच्च पडल्याचे पडला आहे. त्यामुळे काजू आंबा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दिसून आले आधीच गेले काही दिवस तीव्र उष्णतेमुळे काजू आंबा पीक मोहर करपून गेले आहे.नैसर्गिक संकटाने शेतकरी हतलब झाला आहे.
तालुक्यात गेले काही दिवस उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. सरासरी ३८ ते ४० डिग्री तापमानाची नोंद होत आहे. कोकणात 40 डिग्रीपर्यंत तापमान वाढणे हे बागायती पिकांसाठी अत्यंत धोकादायक आहे. या तीव्र उष्णतेने आंबा, काजुचा मोहर व कोवळी फळे करपून जात आहेत. या संकटात आणखी भर म्हणून गेले दोन दिवस सह्याद्री पट्ट्यातील गावांना जोरदार वादळाचा सामना करावा लागत आहे. या जोरदार वादळामुळे काजूची कोवळी बी, तसेच कोवळी कैरी मोहोर गळून पडला आहे.
तालुक्यातील नावळे, सांगुळवाडी,खंबाळे भुईबावडा आखवणे, मौदे, भोम, करूळ,कुंभवडे , सडूरे, आचिर्णे, सह अन्य गावांना या वादळाचा तडखा बसला आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील तसेच कृषी अधिकारी नितीन देशपांडे यांची भेट घेऊन निवेदन सादर करीत पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.