कोंकण एक्सप्रेस
तिलारी खोऱ्यातील हत्तींचा आठ दिवसांत बंदोबस्त करा; अन्यथा सात मार्चपासून वनविभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांचा इशारा
दोडामार्ग : प्रतिनिधि
तिलारी खोऱ्यातील गावांत ऐन काजू हंगामात हत्तींचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. येथे आठ दिवसात या हत्तींचा बंदोबस्त करावा, अन्यथा ७ मार्चपासून येथील वनविभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यासह तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व शेतकऱ्यांनी दिला आहे.
तिलारी खोऱ्यात हत्तींनी धुमाकूळ माजविला आहे. शेतकऱ्यांच्या फळबागायतींसह शेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. अन्नाच्या शोधात हे हत्ती लोक वस्तीतही शिरकाव करू लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी वर्गात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय मनुष्यावर हल्ला चढविण्याच्या अनेक घटनाही यापूर्वी घडले आहे. या हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे.