कोंकण एक्सप्रेस
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे भर दिवसा फोडले घर
अज्ञाताने लाखोंचा मुद्देमाल पळवला
रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील साळवीस्टॉप येथील बंद बंगला फोडून अज्ञाताने लाखोंचा मुद्देमाल लांबवला. ही घटना गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
फिरोज कुतुबुद्दीन पालकर (50, रा. भारतनगर, साळवीस्टॉप) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिरोजी पालकर आणि त्यांचे कुटुंबिय हे एका लग्नासाठी इस्मालपूरला गेले होते. गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी ते रत्नागिरीला परतल्यानंतर त्यांना आपल्या बंगल्याच्या मागील बाजूचा दरवाजा फोडलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले तसेच कपाटातील रोख 2 लाख 32 हजार आणि 10 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पालकर कुटुंबियांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चोरीची पध्दत पाहून ही घरफोडी सराईत गुन्हेगारांनी केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.