पावसाळा सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कृषी विभागाने मोफत भाजीपाला व बी-बियाणे देण्याची मागणी

पावसाळा सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कृषी विभागाने मोफत भाजीपाला व बी-बियाणे देण्याची मागणी

*कोंकण एक्सप्रेस*

*पावसाळा सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कृषी विभागाने मोफत भाजीपाला व बी-बियाणे देण्याची मागणी*

*रत्नागिरी : प्रतिनिधी*

शेतकऱ्यांना अनुदान देण्यापेक्षा त्यांना पुरक असलेल्या साधनांची मदत शासनाने करुन दिली तर शेतकरी स्वावलंबी होऊ शकतो व गावातील नागरिकांना व शहरी भागातील जनतेला मुबलक प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकतो. कोकणातील ग्रामीण भागात शेतकरी पावसाळ्यात पडवळ, दुधी, भेंडी, भोपळा आणि माठ सारख्या भाज्यांची लागवड करीत असे मात्र आता उपलब्ध होणारे बी-बियाणे चांगल्या दर्जाची नसतात. त्याचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. काबाडकष्ट करुन शेतकरी बी-बियाण्यांची लागवड करतो पण ही बियाणे रुजून येत नाही. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे कष्ट वाया जातात. देशाच्या आर्थिक उन्नतीत शेतकऱ्याचा मोठा सहभाग आहे. मात्र त्याच्या उन्नतीसाठी लागणारी साधने दर्जेदार मिळत नाहीत.

कृषी विभागाने पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे देण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे. गावातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही बियाणी त्यांच्या नावे पोहच करण्याची तजबीज कृषी विभागाने घ्यायला हवी. त्यामुळे भरपूर प्रमाणात शेतकरी बी-बियाणी पेरुन पावसाळ्यात या भाज्या जतन करून त्याचा त्यांना आर्थिक फायदा होईल व राष्ट्रीय उत्पन्नात भर पडेल. स्थानिक पातळीवरील नागरिकांना आपल्याच परिसरातील भाज्या स्वस्त दराने उपलब्ध होतील, असे म्हटले जात आहे. प. महाराष्ट्रातील विकास सोसायटी व ग्रामपंचायतीमधून अशा प्रकारचा प्रयोग केला जातो. मात्र दुर्दैवाने कोकणी जनतेच्या हिताचा विचार करणारा नेता आता दिसून येत नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!