_३६ हजार शिधापत्रिका रद्द_

_३६ हजार शिधापत्रिका रद्द_

*कोकण Express*

 *_३६ हजार शिधापत्रिका रद्द_*

◾ रेशन दुकानावर धान्य घेण्याकरीता न फिरकणाऱ्या लाभार्थी कुटुंबांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात येत आहेत.

◾ *शिधापत्रिका रद्द करण्याची करणे*

▪️ गरजू आणि गरीब लाभार्थींना दोन घास अन्न मिळावे याकरीता केंद्र सरकारकडून स्वस्त धान्य पुरविले जाते.

▪️हक्काचे धान्य दरमहा घेऊन जाणे अपेक्षित असताना काही लाभार्थी रेशन दुकानांकडेच फिरकतच नसल्याची माहिती पुढे आली आहे.

▪️गेल्या पाच महिन्यांत अशा ३६ हजार लाभार्थींनी स्वस्त धान्य घेतले नसल्याने त्यांची शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली आहे.

▪️बोगस शिधापत्रिका, स्थलांतरीत झाल्यानंतरही रेशनकार्ड रद्द न करणे यासह विविध कारणांमुळे वाढीव रेशन धान्य शासनाकडून उपलब्ध होत असते. परंतु, प्रत्यक्षात अनेक लाभार्थी धान्यच घेत नाहीत.

▪️हे धान्य दुकानदारांकडेच शिल्लक राहात असल्याचे निरीक्षण पुरवठा विभागाने नोंदविले आहे. तर अनेक कार्डधारक धान्य घेण्यासाठी येतच नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

◾ *अधिक माहिती:*

⚡जिल्ह्यात १ लाख ७४ हजार अंत्योदय कार्डधारक असून, सहा लाख प्राधान्य कुटुंब लाभार्थी आहेत. कार्ड रद्द झालेल्या लाभार्थी कुटुंबांना स्वस्त धान्य उपलब्ध होणार नाही.

👍 त्यासाठी त्यांना नव्याने सर्व पुराव्यांसह अर्ज करावा लागेल. नियमात असेल तरच धान्य मिळेल असे पुरवठा विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!