*कोंकण एक्सप्रेस*
*सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकी !*
*सावंतवाडीतील ठीक ठिकाणच्या धोकादायक गतिरोधकांना पांढऱ्या पट्ट्या मारण्याचा उपक्रम घेतला हाती*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
शहरात वाढत चाललेल्या अपघातांचा गांभीर्याने विचार करून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून धोकादायक गतिरोधकांना पांढऱ्या पट्ट्या मारण्याचा उपक्रम राबवण्यात आला.या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव,पेंटर लक्ष्मण कदम, पेंटर मंगेश सावंत तसेच संस्थेचे सचिव समीरा खलील, सुजय सावंत, युवराज राऊळ, गौरव रजपूत, दिव्या सूर्याजी,सचिन मोरजकर ,प्रशांत मोरजकर, संदीप निवळे यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते दिव्या सूर्याची,अजय गोंडावळे, नीरज देसाई, विनायक गावस, संदीप निवळे, सुशील चौगुले, संजय वरेरकर, गजानन बांदेकर, प्रशांत मोरजकर यांनी सामाजिक बांधिलकीच्या सदस्यांचे कौतुक केले.आज रात्री पुन्हा शहरातील उरलेल्या गतिरोधकांना पट्ट्या मारण्याचा उपक्रम हाती घेणार आहोत असे संस्थेच्या रवी जाधव यांनी सांगितले शहरवासीयांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.