*कोंकण एक्सप्रेस*
*स्वच्छता अभियानातून कॅडेट्सची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानवंदना – सरपंच सौ संजना आग्रे*
*कणकवली : प्रतिनिधी*
स्वच्छता अभियानातून कॅडेट्सची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानवंदना – सरपंच सौ संजना आग्रे
फोंडा स्टॅन्ड आणि हायस्कूलच्या एनसीसी कॅडेट्स कडून एस.टी. स्टँड परिसराची स्वच्छता !
स्वच्छता अभियान एक निमित्त मात्र आहे. प्रत्येकाने स्वतः पासून स्वच्छतेची कास जोपासली तर, आपला गाव- तालुका-जिल्हा आणि पर्यायांनी आपला देश, स्वच्छ राहील. स्वच्छतेचा संबंध थेट आरोग्याशी येत असल्याने, रोगमुक्त- सुदृढ परिसर राखण्यात आपला वाटा स्तुत्य राहील. एस.टी परिवाराने राष्ट्रीय कॅडेट कोर च्या साह्याने, बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेत, सार्वजनिक सुविधांची काळजी घेत, स्टॅन्ड स्वच्छ- सुंदर करण्यात आणि सेवा देऊन, त्यांना खरी मानवंदना दिली आहे. असे उद्गार फोंडाघाट सरपंच सौ संजना आग्रे यांनी काढले.