*कोकण Express*
*सैनिक स्कूल आंबोली कडून फी वसुलीसाठी पालकांना धमक्यांची पत्र*
*कोरोनाच्या भीतीने पालकांची ऑनलाइन शिक्षण देण्याची आणि माफक फी आकारण्याची मागणी*
*आपल्या राजकीय ओळखीचा फायदा घेत सैनिक स्कूल चा पालकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न ?*
*सर्व पालक शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांच्या कडे मागणार दाद*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
सैनिक स्कूल आंबोली चे ६वी,७वी,८वी च्या पालकांनी ऑनलाईन शिक्षणच आपल्या मुलाना सुरु ठेवावे आणि या कोव्हिड परिस्थिती माफक फी आकारावी हि मागणी करत आपल्या पाल्याना घरीच ठेवल्याने संस्था हटवादीपणे मुलाना स्कूल मध्ये सोडावे यासाठी आणि मोठ्या प्रमाणावरील फी वसुलीसाठी पालकांना पत्र पाठवून धमकवण्याची कामे करत असून सर्व पालक शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कडे न्याय मागणार असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे
यावेळी बोलताना पालकांनी सांगितले,आपल्या काही मुलांचे ६ महिन्यापासून तर काहीं मुलांचे मागील १ महिन्यापासून संस्थेला अपेक्षित पूर्ण फी भरली नाही म्हणून ऑनलाईन शिक्षण बंद करून टाकले होते यासाठी सैनिक स्कूल आंबोली येथील ६वी ,७वी,८वी च्या पालकांनी आपल्या मुलांचे संस्थेने बंद केलेले ऑनलाईन शिक्षण सुरु करावे यावर्षी माफक फी आकारावी या मागण्यांसाठी २३ फेब्रुवारी रोजी स्कूल समोरच केलेल्या आंदोलनावेळी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मध्यस्थी करत १ मार्च पासून ऑनलाईन शिक्षण सुरु करून फी ३०००० पर्यंत आकारावी अशा सूचना स्कूल प्राचार्यांना दिल्या तसेच सैनिक स्कूल संस्था चालक आणि पालक यांच्यामध्ये समन्वयाने तोडगा निघावा यासाठी तहसीलदार यांनी पालक आणि संस्था चालक यांची २६ फेब्रुवारी रोजी तहसीलदार कार्यालय सावंतवाडी येथे मिटींग आयोजित केली मात्र पालक वेळेच्या आधीच उपस्थित असूनही मा. तहसीलदार यांच्या केबिन मध्ये वेळेवर आलेले नाही असे कारण पुढे करत हजर झालेल्या संस्था चालकांनी चर्चा न करताच तेथून पळ काढला मात्र काही पत्रकारांना हाताशी धरून पालकच उपस्थित न राहिल्याचे आणि माध्यमांच्या मार्फत धमकी वजा इशारे देण्याचा पण प्रयत्न हि संस्था करत असल्याचे यावेळी सांगितले.
दरम्यान याबाबत संस्थेला वेळोवेळो विनंती करून झाल्यानंतर सर्व पालकांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग,पालकमंत्री तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या कडे दाद मागूनही संस्था चालक आपल्या राजकीय वजनाचा वापर करून मुलांच्या भविष्याला वेठीशी धरून, मुलाना स्कूल मधून काढण्याची पत्र पाठवून पालकांकडून मोठ्या प्रमाणातील फी वसुलीसाठी दबाव आणत असून याबाबत आता न्याय मागण्यासाठी सर्व पालक शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे हि तक्रार करणार असल्याचे सांगितले.