*कोंकण एक्सप्रेस*
*तर..दहावी, बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा !!!*
*मागण्या मंजूर न झाल्यास परीक्षा कामकाजावर बहिष्कार*
*शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे माध्य.शिक्षणाधिकारी सौ.सुवर्णा सावंत यांना दिले निवेदन*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करूनही मागण्यांची दखल घेतली जात नाही.त्यामुळे आगामी दहावी, बारावी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल,असा इशारा शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन प्राथमिक शिक्षण अधिकारी बी.एम कासार यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन शिक्षणमंत्री दिपक – केसरकर यांनी संघटनेच्या मागण्या रास्त असून मार्गी लावाव्यात, असे निर्देश दिले होते.मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून या मागण्यांबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.राज्यातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे संघटनेच्यावतीने मार्चमध्ये होणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
संघटनेचे जिल्हा अध्यक्ष याच्या वतीने नरेंद्र गावंडे, गोपाळ चौधरी यांनी निवेदन दिले.या आहेत मागण्याशिक्षण विस्तार अधिकारी पद शालेय शिक्षण विभागाकडे वर्ग करून सामान्य राज्यसेवा गट-अ अराजपत्रित सेवामध्ये समाविष्ट करावे.शिक्षणसेवा गट-ब प्रशासन शाखाचे सेवाप्रवेश नियमात बदल करून पदोन्नतीचे प्रमाण ८० टक्के करावे.शिक्षण विस्तार अधिकारी संवर्गास ५० टक्के कोटा निश्चित करावा. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना वेतनासोबत ८ हजार रूपये प्रवास भत्ता मिळावा.
उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदांच्या पदोन्नतीची सेवा ज्येष्ठता यादी तत्काळ अंतिम करावी.श्रेणी ३ या पदावर पदोन्नती झालेल्या विस्तार अधिकाऱ्यांना एक वेतन वाढ मिळावी. बीट हे मुख्यालय असावे.याबाबत चे निवेदन प्रमुख मागण्यासाठी देण्यात आले आहे.