*कोंकण एक्सप्रेस*
*आजरा येथे कत्तलीसाठी जाणाऱ्या गायींचे प्राण गोरक्षकांनी मॅक्सिमो गाडीचा पाठलाग करत वाचवले*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
आज पहाटे साडेचार वाजता बजरंग दल व विश्व हिंदू परिषद च्या कार्यकर्त्यांनी उपरलकर देवस्थान नजीक आजरा येथे कत्तलीसाठी जाणाऱ्या चार गायींचे प्राण वाचविले. मॅक्सिमो गाडीचा पाठलाग करून ही गाडी बजरंग दलाचे संयोजक कृष्णा धुळपणावर, गोरक्षक जिल्हाध्यक्ष दिनेश गावडे,प्रखंडसहमंत्री विश्व हिंदू परिषद स्वागत नाटेकर,यांनी ही मोहीम फत्ते केली.
पहाटेच्या सुमारास गाईना कत्तल कत्तलीसाठी आजरा येथे नेत असल्याची खबर दिनेश गावडे यांना मिळताच त्यांनी आपल्या साथीदारांना याबाबतची कल्पना दिली व सदर गाडीच्या पालथीवर हे जण सर्व राहिलेत व गाडीचा पाठलाग करून उपप्रकार देवस्थान नजिक गाडी अडविण्यात यश मिळविले व चार गाईंचे प्राण वाचवले.सदर मॅक्सिमो टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.गाईला राज्य मातेचा दर्जा मिळूनही अशा प्रकारची कत्तल होत असेल तर संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी हिंदू समाजातून केली जात आहे. नूतन पालकमंत्री नितेश राणे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.