देशात आता होत असलेली आंदोलने ही मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी

देशात आता होत असलेली आंदोलने ही मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी

*कोकण Express*

*देशात आता होत असलेली आंदोलने ही मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी*

*मोदी सरकारमधील एक तरी भ्रष्टाचार दाखवा…*

*भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे*   

*कणकवली ः प्रतिनिधी*

देशात आता होत असलेली आंदोलने ही मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी आहेत. काँग्रेस पक्ष केवळ विरोधासाठी विरोधाचे राजकारण करत आहे. मोदी सरकारच्या गेल्या ७ वर्षाच्या कार्यकाळात एक तरी भ्रष्टाचार विरोधकांनी दाखवावा असे आव्हान भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी आज येथे दिले.


कणकवली येथील पत्रकार परिषदेत श्री तावडे बोलत होते. यावेळी बँक संचालक अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, सभापती मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलींद मेस्त्री, बबलू सावंत, मेघा गांगण, संतोष पूजारे,समर्थ राणे,पूजा कर्पे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
कॉग्रेसला विरोध करण्यासाठी हा खटाटोप आहे.कृषी कायद्याबद्दल पंजाब व छत्तीसगडमधील कॉग्रेस सरकारने अडाणी बरोबर करार केले.देशात पहिलं मोदी नावाने एक मैदान केले.त्याबद्दल विरोधकांनी टीका केली.पण देशात कित्येक मैदाने राजीव गांधी,इंदिरा गांधी,जवाहर नेहरु यांच्या नावाने २७ ठिकाणी आहेत,असा टोला विनोद तावडे यांनी लगावला.

देशात महात्मा गांधी,जे.पी. नारायण,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक आंदोलने केली. डॉ.आबेडकर आंदोलनात केव्हाच हिंसा नव्हती.आता आंदोलने होतात,तेच तेच लोक असतात एकत्रित पणे ठरवून आंदोलने करतात.त्याला आंदोलन जीवी लोक म्हणतात.सिंधु बॉर्डर,शाईनबागला आंदोलन केल्याने, रस्त्यावर बसून आंदोलकांनी जनजीवन विस्कळीत केले .मला असं वाटत देशात निवडक गोष्टी ठरवून आंदोलन केले जात आहेत.
त्या आंदोलकांवर भाजपचे सरकार अन्याय काय करते?यासाठी प्रयत्न काही आंदोलन जीवी लोक करतात,असा आरोप विनोद तावडे यांनी केला.मोदी सरकार आल्यानंतर ७ वर्षे झाली.एक तरी भ्रष्टाचारी एक तरी दाखवा.एक प्रकारे विरोधाला विरोध काँग्रेस करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!