*कोकण Express*
*गृहबांधणीचे अधिकार पूर्ववत ग्रामपंचायत यांच्याकडे दिले*
*कणकवली ः प्रतिनिधी*
रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गृहबांधणीचे अधिकार पूर्ववत ग्रामपंचायतींकडे द्यावेत अशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सिंधुदुर्ग राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबीद नाईक यांनी केली होती. ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी याबाबतचा अध्यादेश काढला असून गृहबांधणीचे अधिकार पूर्ववत ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. त्यामुळे अबीद नाईक यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. 2015 सालपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील खेडेगावातील गृहबांधणी मंजुरीसाठीही महसूल विभाग आणि जिल्हा नगररचना विभागाची परवानगी घ्यावी लागत होती. त्यापूर्वी ग्रामीण भागातील गृहबांधणीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना होते. 2015 पासूनच्या नवीन नियमांमुळे ग्रामीण भागात घर बांधताना परवानगी घेताना अनंत अडचणींना जनतेला सामोरे जावे लागत होते. याबाबत अबीद नाईक यांनी 4 डिसेंबर 2020 रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे लक्ष वेधून रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गृहबांधणीचे अधिकार पूर्ववत स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याची मागणी केली होती. ग्रामविकास मंत्र्यांनी काढलेल्या अध्यादेशानुसार ग्रामीण भागातील गृहबांधणी चे अधिकार आता पूर्ववत स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत.