*कोंकण Express *
*मतदारसंघाची वाईट परिस्थिती असताना सुद्धा केसरकराना एवढी मत पडणे म्हणजे आश्चर्यकारक – राजन तेली*
*जनतेचा कौल मान्य ; सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मानले आभार*
* सावंतवाडी : प्रतिनिधी*
सावंतवाडी मतदारसंघात आरोग्याचा प्रश्न,रोजगाराचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, मच्छीमारांचा प्रश्न एवढा गंभीर असताना सुद्धा केसरकर यांना शिवसेना पक्ष फुटी नंतर 80 हजार मतं पडतात हे आश्चर्यकार्य आहे. असे मत माजी आमदार राजन तेली यांनी आज इथं व्यक्त केला.
दरम्यान विरोधात वातावरण असताना देखील एवढी मते पडणे म्हणजे सध्याचे राजकारण हे सच्चा कार्यकर्त्यांचे काम नाही. तसेच जो काही निकाल आला तो आश्चर्यकारक आहे. परंतु, मी सर्व सामान्य कार्यकर्त्यांचे आभार मानून जनतेने दिलेला कॉल मान्य करतो असे राजन तेली यांनी आपल्या पत्रकात नमूद केले.