अनेक जण विसराळूपणामुळे किंवा स्मरणशक्ती कमी असण्यामुळे त्रस्त असतात. तर बऱ्याच वेळा लहान मुलांची अभ्यासातील एकाग्रता कमी आहे अशी तक्रारदेखील पालक करताना दिसतात. मात्र अनेक उपाय किंवा महागडी औषधे घेऊनसुद्धा अनेकांना विशेष गुण येत नाही. मात्र आयुर्वेदात असे उपाय किंवा वनस्पती आहेत जे एकाग्रता वाढविण्यासोबतच स्मरणशक्ती तल्लख करतात.
१.ब्राह्मी –
ब्राह्मी ही वनस्पती बुद्धीमत्ता वाढविण्यासाठी सर्वोत्तम टॉनिक असल्याचं म्हटलं जातं. बुद्धीची क्रियाशीलता वाढवण्यासाठी आज दिल्या जाणाऱ्या अनेक आयुर्वेदिक टॉनिकमध्ये ब्राह्मीचा आवर्जुन वापर केला जातो. ताण-तणाव दूर करून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ब्राह्मी अत्यंत परिणामकारक आहे. त्याचबरोबर ब्राह्मीमुळे मेंदूतील पेशींच्या धाग्यांची लांबी वाढते आणि त्याचा फायदा थेट स्मरणशक्ती, एखादी गोष्ट शिकण्याच्या क्षमतेत वाढ करण्यास मदत करण्यात होतो.