आम्ही असे बॅनर लावू की तेलींना निवडणूक सोडून कणकवलीत जावे लागेल – संजू परब…*

आम्ही असे बॅनर लावू की तेलींना निवडणूक सोडून कणकवलीत जावे लागेल – संजू परब…*

*कोंकण Express*

*आम्ही असे बॅनर लावू की तेलींना निवडणूक सोडून कणकवलीत जावे लागेल – संजू परब…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्याविरोधात लावलेला तो बॅनर हा विरोधी उमेदवार राजन तेली यांच्याकडून लावण्यात आला आहे. असा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी केला. रात्री दरोडेखोरासारखे बॅनर लावायची सवय ही तेलींनाच आहे. राणेंच्या विरोधात लावलेला हा बॅनर शेवटचा आहे. यापुढे मतदारसंघात एकजरी बॅनर दिसला तर आम्ही असे बॅनर लावू की तेलींना निवडणूक सोडून कणकवलीत जावे लागेल असा इशाराही श्री. परब यांनी दिला. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, समोर येऊन लडण्याची हिंमत तेलींमध्ये नाही. हिंमत असेल तर त्यांनी जाहीर सभा घेऊन आरोप करावेत. त्याला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. आम्हाला बाहेरची माणसे नको. सावंतवाडीतील लोकप्रतिनिधी सक्षम आहेत. आम्ही तक्रार करत नाही, औकात काढतो. असे संजू परब म्हणाले.

बॅनर कोणी लावले आम्हाला माहीत आहे. याची माहीती जाहीरपणे प्रशासनाला देत आहोत. त्यामुळे यापुढे त्यांनी अशी हिंमत करू नये. आमच्या बॅनरमधील मजकूर असा असेल की ते पुन्हा बॅनर लावायची हिंमत करणार नाही. असा इशारा संजू परब यांनी दिला. याप्रसंगी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, युवासेनेचे सुरज परब, हेमंत बांदेकर, क्लेटस फर्नाडिस आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!