उपमुख्यमंत्री फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कडवट मावळे; ठाकरे ,राऊत हे छ.शिवराय द्वेषी

उपमुख्यमंत्री फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कडवट मावळे; ठाकरे ,राऊत हे छ.शिवराय द्वेषी

*कोंकण Express*

*उपमुख्यमंत्री फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कडवट मावळे; ठाकरे ,राऊत हे छ.शिवराय द्वेषी*

*आमदार नितेश राणे यांनी उदाहरणसहित केले स्पष्ट*

*मातोश्री चा लाडका असेला असीम सरोदे याने अरबी समुद्रातील स्मारक न्यायालयात याचिका दखल करून अडवले*

*मुका मोर्चा असे कार्टून छापून माता-भगिनींचा अपमान केला*

*ठाकरे नी मालवण किल्ला येथील शिवरायांच्या मंदिराला ५० लाख देण्याचे आश्वासन देवून फसवले*

*हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आधी स्मारक उभे करण्याची हिम्मत दाखवा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कडवट मावळे आहेत.उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे द्वेषी आहेत. याच लोकांनी स्वतःच्या मुखपत्रातून मुका मोर्चाचे कार्टून छापून माता-भगिनींचा अपमान केला. मातोश्री चा लाडका जावई असलेला वकील असीम सरोदे जो उद्धव ठाकरेंची प्रत्येक केस लढतो त्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारका विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आणि ते स्मारक अडकवून ठेवले.त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची लायकी तरी आहे का असा संतप्त सवाल भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलताना आमदार निलेश राणे यांनी ठाकरे राऊत यांचा समाचार घेतला.
आमदार नितेश राणे म्हणाले,छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याची ज्याची लायली नाही तो राऊत फडणवीस साहेबांवर आरोप करत होतो.मुघलांची पिलावळ महाराजांच्या स्मारका बद्धल आम्हाला शिकवणार ? ज्याच्या मुळे अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ शकले नाही तो असीम सरोदे कोणाचा जावई आहे .हिम्मत असेल तर अरबी समुद्रात होणाऱ्या महाराजांच्या स्मारका बाबतची याचिका मागे घेण्यास असीम सरोदे ला उध्दव ठाकरे यांनी सांगावे.
उद्धव ठाकरे 50 लाख रुपये आमच्या मालवण मधील छत्रपतींच्या मंदिरास देणार होता.त्याचा विसर पडला आहे का ? आता उद्धव ठाकरे यांचा गजनी झाला आहे का ? ते आधी पैसे द्या आणि मंदिरे बांधण्याची भाषा करा.असा सवालही यावेळी त्यांनी केला.
कोल्हापूर मध्ये राजेंचा अपमान झाला, गादीचा आपमान केला त्या बंटी पाटील का रोखलं नाही. उलट शाब्बासकी दिली.विशाल गड च्या वेळी हे कुठे होता ? जानाब उद्धव ठाकरेंनी आम्हाला छत्रपतींच्या प्रेमाबद्धल शिकवू नये. पहिले सामन्या मध्ये छापलेल्या कार्टून बाबत तोंडाने जनतेची माफी मागितली मागा.असे आमदार नितेश राणे यांनी सुनावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!