प्रत्येक गोष्टीत राजकारण करणाऱ्या संजय राऊत सारख्यांना राजकारनातून हद्दपार केले पाहिजे

प्रत्येक गोष्टीत राजकारण करणाऱ्या संजय राऊत सारख्यांना राजकारनातून हद्दपार केले पाहिजे

*कोंकण Express*

*प्रत्येक गोष्टीत राजकारण करणाऱ्या संजय राऊत सारख्यांना राजकारनातून हद्दपार केले पाहिजे*

*भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची टीका*

*मोदी सरकार आपल्या पासून देशात रेल्वे अपघात कमी झाले*

*कोरोणा काळात उद्धव ठाकरेंनी मात्र महाराष्ट्र कलंकित केला*

*व्यक्तिगत दुष्मनी पुरस्कार उद्धव ठाकरे यांनीच द्यावा लागेल*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कोरोणा काळात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र कलंकित केला. आम्ही त्यावर राजकारण केले नाही.मात्र संजय राऊत सारखा नालायक बांद्रा रेल्वे स्टेशन गोरखपुर एक्सप्रेस मध्ये चेंगरा चेंगरीत नऊ जखमी झाले त्याचे राजकारण करतोय.अशा कपटी लोकांना राजकारनातून हद्दपार केले पाहिजे अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.ते प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.
आमदार नितेश राणे म्हणाले,बांद्रा स्टेशनं ला दुःखद घटना घडली सर्व प्रकारबाबत केंद्र सरकार उपाय योजना करतील.परत अशी घटना घडू नये म्हणून मार्ग काढतील. मोदी सरकार आपल्या पासून रेल्वे अपघात कमी झाले आहेत मात्र यात घाणेरडे राजकारण राऊत ने सुरु केले आहे.कोणत्या गोष्टीवर राजकारण करावे याची नैतिकता राऊत ला नाही. कोरोना काळात ह्याच्या मालकाने तोंड काळे केले. महाराष्ट्राची बदनामी केली.तरी आम्ही सभ्यता म्हणून शांत राहिलो.स्वतःच्या बुडाखाली किती आग लागलीय ते पाहायचं नाही.आणि दुसऱ्यांवर आरोप करत सुटायचे हे हे संजय राऊत ने बंद करावे.
ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात ते रेल्वेमंत्री होते तेव्हा त्यांच्या काळात अपघात झाले नाही का.आमचे रेल्वे मंत्री ऑन फिल्ड आहेत. तुझ्या मालकासारखे ऑनलाईन नाहीत.आधुनिकतेच्या गप्पा मारायच्या आणि बुलेट ट्रेन च्या विषयात फोडा फोडी करण्याचा प्रकार करायचा.
व्यक्तिगत दुष्मनी करण्याबाबत जर पुरस्कार द्यायचा असेल तर त्याचे उद्धव ठाकरे पहिले मानकरी ठरतील.संजय राऊत माझ्या बाजूला बसून बोलला असता तर हा विषय त्याने कधीच काढला नसता.राणे साहेबांची जेवणाच्या ताटावरून अटक करण्याचा प्रयत्न करणे, त्यांचे कुटुंब नातवंडे ज्या घरात राहतात ते घर तोडण्याचा प्रयत्न करणे.याला व्यक्तिगत दुष्मनी म्हणतात. कंगना रणावत च घर तोडणे, अर्णव गोस्वामी ला अटक करणे याला दुश्मनी म्हणतात.दुष्मनीत पीएचडी केलेल्या नालायकानी आमच्या नेत्यांवर टीका करू नये. असा खणखणीत इशारा सुद्धा यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!