महायुतीचा धर्म जो पाळत नसेल त्यांनी एक मिनिट सुद्धा पदावर राहू नये*

महायुतीचा धर्म जो पाळत नसेल त्यांनी एक मिनिट सुद्धा पदावर राहू नये*

*कोंकण Express*

*महायुतीचा धर्म जो पाळत नसेल त्यांनी एक मिनिट सुद्धा पदावर राहू नये*

*शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुनावले खडे बोल*

*आमदार नितेश राणेंच्या मागणीची दखल घेत महायुती धर्म पाळण्याचा दिला संदेश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. कोणी वाह्यात बोलू नये,वागू नये.महायुती म्हणून आपण राज्यात जनतेचे हित जोपासत आहोत याची जाणीव ठेवा. महायुतीचा धर्म जो व्यक्ती पाळत नसेल अशा व्यक्तीला एक मिनिट सुद्धा त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. असे खडे बोल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांनी सुनावले.
कणकवली येथे युवा संदेश प्रतिष्ठानच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात दीपक भाई बोलत होते यावेळी आमदार नितेश राणे यांनी महायुतीचे सिंधुदुर्गातील नेतृत्व म्हणून दीपक भाई हे ज्येष्ठ नेतृत्व आम्हाला पुरेसे आहे. दुसऱ्यांची गरज नाही असे सूचित केले होते. आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचा आधार घेत दीपक भाई पुढे म्हणाले.
यापुढे महायुतीचा धर्म पाळला जाईल. आम्ही सर्वजण माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. त्यामुळे तुम्ही सेना सोडली तेव्हा सर्वच लोक तुमच्याबरोबर घेऊ गेला. काही लोक आमच्याकडे सुद्धा ठेवा म्हणजे मतभेद होण्याचा प्रश्नच येणार नाही. असे आमदार नितेश राणे यांना सांगतानाच येत्या काळात हा बदल करा असे सूचित केले. राजकारणातील सर्वांनीच राणे साहेबांचे आत्मचरित्र वाचावे. त्यांची प्रेरणा हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्या पुस्तकातील सर्वाधिक भाग बाळासाहेबांवर लिहिलेला आहे. राणे साहेबांच्या मनात आपल्या गुरुबद्दल असलेले ही प्रेम भावना नेहमीच आमच्यासारख्यांना प्रेरणादायी ठरते. जीवनात मतभेद होऊ शकतात मात्र मनभेद असू नये आणि मतभेद कधी मिटवावे हे माणसाला कळले पाहिजे. अनेक लोक शाळेत जातात म्हणून ते मंत्री होऊ शकत नाही. राजयोग लागतो अशा राजयोगातून माझ्या सारखा माणूस मंत्री झाला. माझ्या लहानपणी शिवराम राजे भोसले सर्वाधिक मतांनी निवडून गेले होते. त्यावेळी ते मंत्री होतील अशी अपेक्षा होती मात्र सर्वांनाच ते पद मिळत नाही. शिवराम राजे भोसले, भाई सावंत, नारायण राणे ही आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आपण काम केले पाहिजे. मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यापदाचा फायदा आपल्या जिल्हाला कसा करून देता येईल यावर लक्ष दिले पाहिजे.मी ते काम करत आहे.कणकवली विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सुरू आहेत. असे काम करणारा आमदारांच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पूर्ण ताकतीने उभी करणार असा विश्वासही यावेळी ज्येष्ठ नेते मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!