*कोंकण Express*
*हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस विरोधात लढा दिला त्याचे मुलगा,नातू दिल्लीत पाय चाटतात*
*भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांची जोरदार टीका”
*चाटण्यात यांची पीएचडी, चाटनारा पक्षप्रमुख म्हणा”
*ठाकरे,देशमुख,राऊत यांच्यात हिम्मत असेल तर परमवीर सिंग सोबत नार्को टेस्ट द्या*
*कणकवली ः प्रतिनिधी*
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी देशातल्या आणि विदेशातल्या मोठ्यात मोठा नेत्यांना मातोश्रीवर येवून नतमस्तक व्हायला लावले.आज त्यांचा मुलगा, नातू कपडे काढून दिल्लीत काँग्रेसचे पाय चाटताना पाण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे ठाण्यात लागलेले “घालीन लोटांगण..” हे बॅनर योग्यच आणि समर्पक आहेत. चाटण्यात उद्धव ठाकरे यांची पीएचडी झालेली आहे.बाळासाहेबांनी काँग्रेस विरोधात आवाज उठवून लढा दिला.आज त्याच काँग्रेसचे पाय चाटले जात आहेत. उद्धव ठाकरे ना उबाठा पक्ष प्रमुख बोलू नका चाटनारा पक्ष प्रमुख बोला.एवढी चाटली आहे कि जिभेच हाड मोडलं असेल. अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.
नाना पाटोलेंनी जे वक्तव्य केले त्यावरून स्पष्ट झाले आहे की, उद्धव ठाकरे दिल्लीला मुजरा करायला गेले.यावरून तुमची लायकी राज्याला माहित झाली आहे. असेही ते म्हणाले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी महाविकास आघाडीच्या काळात वसुली कशी व्हायची ते सांगितलं.परमवीर हा आरोपी आहे असं सांगणारे राऊत यांना परमवीर उध्दव ठाकरे यांच्या किती जवळ होते हे माहीत आहे.परमवीर सिंग बोलायचं की परमवीर ठाकरे बोलायच येवढेच राहिले होते.मातोश्री मध्ये एक खोली देण बाकी होत.भाजप नेते,पत्रकार यांना अटक ठाकरे यांच्या सांगण्यावरून यांनीच केली होती.उद्धव ठाकरे,अनिल देशमुख, संजय राऊत तुम्ही खरंच मर्द असाल तर परमवीर सोबत नार्को टेस्ट घेऊन दाखवा.बालिश उत्तर राऊत ने देऊ नये. तुमचा बुरखा फाडण्याचं काम परमवीर सिंग करत आहेत. ही सर्व प्रकरणे फक्त १० टक्केच बाहेर आली आहेत ९० टक्के बाहेर येईल तेव्हा जनता जनता तुम्हाला चपलेने मारेल अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.
परमवीर सिंग हे दिशा सलियान आणि सुशांत सिंग च्या हत्येच्या काळात आयुक्त होते.तेव्हा जे घडलं ते सगळं त्यांना माहीत आहे.उद्धव ठाकरे ना ब्लॅकमेल करण्यासाठी महावीकास आघडीचा कोणत्या नेत्याकडे या खुनाचे फुटेज आहे ते त्यांना माहीत आहे.येत्या विधान सभा निवडणूक काळात उद्धव ठाकरे ना ब्लॅक मेल करण्यासाठी ते फुटेज त्यांचेच मित्र पक्षाचे लोकांकडून वापरले जाणार आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्यावर हात भर फाटली. त्यानंतर राऊत आपला हात नसल्याचे सांगत आहे. मनोहर जोशी सरांना स्टेज वरून उतरविण्याचा आदेश उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरेंचाच होता.त्यामुळे तुम्ही कसे आहात आणि कसे आदेश देता हे सर्वांना माहीत आहे.
आंदोलन करायला सांगायचा आणि मग पॅन्ट पिवळी झाली कि ते आमचे नाहीत हे राऊत आणि त्याचा मालक करू शकतो. कुठलाही कडवट मराठा असे करणार नाही उबाठाचे महाविकास आघाडीचे आणि तुतारीचे कार्यकर्ते होते.मराठा आंदोलकांना बदनाम करण्याची हिंमत संजय राऊत यांनी करू नये.असा इशारा दिला.
आमचे मुख्यमंत्री दिल्लीला राज्याच्या विकासासाठी जाऊन बसतात. तुझ्या मालकासारखं मुजरा करायला जातं नाही.असा टोला सुद्धा यावेळी नितेश राणे यांनी लगावला.
राणे साहेब व दरेकर जी सत्य सांगत आहेत. मराठा समजला प्रबोधन करत आहेत. जरांगेच्या आंदोलनाचा मराठा समाजाला कमी मुस्लिम समाजाला फायदा जास्त झाला आहे. Ews चे दाखले मराठा समाजाचे या हे आंदोलन करून बदल केले आणि नोकरी त्युळे नुकत्याच झालेल्या पोलिस भरती मध्ये मराठी मुल ews चा फायदा घेवू शकले नाहीत.