*नांदगाव विभागातील वीज समस्यांबाबत कार्यकारी अभियंतांना ग्रामस्थांचा घेराव*

*नांदगाव विभागातील वीज समस्यांबाबत कार्यकारी अभियंतांना ग्रामस्थांचा घेराव*

*कोंकण Express*

*नांदगाव विभागातील वीज समस्यांबाबत कार्यकारी अभियंतांना ग्रामस्थांचा घेराव*

*वीज समस्या 30 ऑगस्ट पूर्वी सोडवण्याच्या आश्वासनाअंती आंदोलन मागे ; नागरिकांनी वीज वितरणच्या अधिका-यांना प्रश्नांचा भडीमार करत विचारला जाब*

*नांदगाव : प्रतिनिधी*

नांदगाव शाखा कार्यालय अंतर्गत येणा-या 12 गावांमध्ये वारंवार वीज खंडीत होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत नळयोजना वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पाणी पुरवठा करताना अडचणी येत आहेत. वीज मीटर व वीजेची उपकरणे उच्चदाबामुळे जळून खाक होत आहेत. मान्सुन पूर्व झाडी कटींग न झाल्यामुळे वीजेच्या तारांवर झाडे कोसळत आहेत , अपघात झाल्यास जबाबदार कोण ? वीज बिले वाटप उशिराने का होतात ? अधिकारी व कर्मचारी ग्राहकांशी उध्दत बोलतात या सगळ्या प्रश्नांचा भडीमार करत वीज ग्राहकांनी कार्यकारी अभियंता विलास बगडे यांना जाब विचारत कनिष्ठ अभियंता पी. एस. पंडीत यांना धारेवर धरले. त्यावर प्रभारी कार्यकारी अभियंता श्री. बगडे यांनी संपुर्ण चर्चेअंती 30 ऑगस्ट पर्यंत वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर स्थगित करण्यात आले.
नांदगाव महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात प्रभारी कार्यकारी अभियंता विलास बगडे यांना नांदगाव दशक्रोशीतील वीज ग्राहकांनी नांदगाव सरपंच भाई मोरजकर , असलदे सोसायटी चेअमन भगवान लोके यांच्या नेतृत्वाखाली घेराव घातला. या आंदोलनात माजी जिल्हा परीषद बांधकाम सभापती नागेश मोरये , असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर , ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर , बेळणे सरपंच अविनाश गिरकर , नांदगाव माजी सरपंच पंढरीनाथ पारकर, ओटव सरपंच रुहीता तांबे, ओटव उपसरपंच दुर्गेश ओटवकर , तिवरे उपसरपंच श्री. वाळवे , असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , उपसरपंच इरफान साटविलकर, तोंडवली बावशी माजी उपसरपंच अशोक बोभाटे, व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे, प्रदीप हरमलकर, कमलेश पाटील , नांदगाव बावशी पोलीस पाटील समीर मयेकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, अनिकेत तर्फे, इक्बाल बटवाले, कोळोशी पोलीस पाटील संजय गोरुले, कोळोशी शिवसेना शाखाप्रमुख संदीप शिंदे , माजी सरपंच श्री. अमृते , शकील बटवाले, अल्लाउद्दीन बोबडे, रज्जाक बटवाले , अतुल सदडेकर , प्रफुल्ल तोरस्कर , राजू तांबे , असलदे माजी तंटामुक्त अध्यक्ष बाबाजी शिंदे, महेश लोके , सोसायटी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , विजय हडकर , विजय आचरेकर , सुभाष परब , श्रीकृष्ण वायंगणकर , अनिल परब , तुषार घाडी , श्रीराम मोरजकर , अविराज वरक , रघुनाथ लोके , माजी सरपंच सुरेश लोके , भाऊ काझी , बाळा लोके , अजय परब , वासुदेव दळवी ,राजु खोत , तुकाराम तुप्पट, मंगेश परब , रामा मोरये , समीर बिडये , पोलीस पाटील पांडुरंग मयेकर , दाजी सदडेकर , सुष्मा सावंत , विनोद मोरये , बाजा मोरजकर , ग्रा.प. सदस्य अक्षता खोत , नमिता मोरये , गौरी परब , तयबा नावलेकर , प्रल्हाद कारेकर , रामा मोरये , गवस साटविलकर आदींसह वीज ग्राहक व सर्वपक्षीय कार्यकर्ते , रिक्षा संघटना , व्यापारी संघटना पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कनिष्ठ अभियंता पी.एस.पंडीत व लाईन मन श्रीकृष्ण आचरेकर व वायरमन उपस्थित होते.
नांदगाव शाखा कार्यालय अंतर्गत नांदगाव असलदे , कोळोशी , ओटव , तोंडवली – बावशी , बेळणे , भरणी , माईण , आयनल , बावशी , सावडाव या गावातील वीज ग्राहकांनी आपल्या वीज समस्या सोडवण्यासाठी नांदगाव वीज वितरणच्या कार्यालयाला धडक दिली. आंदोलनाच्या सुरुवातीलाच असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावांमध्ये वीजेचा खेळखंडोबा सुरु आहे. मान्सुन पूर्व तयारी वीज वितरण कंपनीकडून झालेली नाही. अनेक लाईटच्या पोलवर झाडी वाढलेली आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. तर नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनांसाठी होत असलेला विद्युत पुरवठा लाईनवर मोठ्या अडचणी आहेत. कर्मचारी ग्राहकांशी उध्दटपणे बोलतात . ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर यांनी सर्व गावांमधील प्रलंबित समस्यांचे सरपंचाना घेवून सर्व्हे करावे. माजी बांधकाम सभापती नागेश मोरये यांनी गणपती पूर्वी वीज समस्या सोडवण्यात याव्या . असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर यांनी पावसापूर्वी पुर्वनियोजन झाले असते तर , आता या अडचणी आल्या नसत्या . राजू खोत यांनी वीज बिल वाढीव येत आहेत. त्या बिलावर लावलेले स्थिर आकार व अन्य वाढीव बिलाची माहिती द्या , अशी मागणी केली. यावेळी कनिष्ठ अभियंता यांनी कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता वीज ग्राहकांना त्रास होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या चर्चेत महेश लोके , प्रदिप हरमलकर , आनंद तांबे, पंढरीनाथ पारकर , बेळणे सरपंच श्री. गिरकर , दत्ताराम बिडवाडकर, प्रफुल्ल तोरस्कर , कमलेश पाटील यांच्यासह वीज ग्राहकांनी सहभाग घेतला.
यावेळी वीज ग्राहक आणि अधिका-यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली . त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत मुद्द्यांवर चर्चा करावी , अशी विनंती केली. त्यावेळी प्रभारी कार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी वीज समस्यांबाबत आम्ही तातडीने उपाययोजना करायला सुरु करु , गणेश चतुर्थी पूर्वी 30 ऑगस्ट पर्यंत झाडी कटींग व वीज समस्या सोडवल्या जातील. नागरीकांनी झाडी तोडत असताना सहकार्य करावे, या पुढील काळात आमचे अधिकारी व कर्मचारी सर्वांशी सौजन्याने बोलतील असा विश्वास दिला. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले . आगामी काळात वीज वितरणने कामे पूर्ण न केल्यास यापेक्षा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हवालदार विनोद चव्हाण, चंद्रकांत झोरे, पोलीस कॉन्स्टेबल मकरंद माने, किरण मेथे, महिला पोलिस सुप्रिया भागवत, विनया सावंत आदींसह पोलीस कर्मचा-यांचा बंदोबस्त पोलीसांनी ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!