*कोकण Express*
*‘वो भी क्या दिन थे’ पुन्हा अनुभवले !*
*२००३ – २००५ च्या कला शाखेचा ’स्नेहगंध मैत्री’चा मेळावा पिसेकामते येथे रंगला…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली कॉलेज कणकवलीच्या सन २००३ – २००५ कला शाखेच्या बॅचचा स्नेहमेळावा पिसेकामते येथील गुरू माऊली रिसॉर्ट येथे पार पडला. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील १५ वर्षांचा जीवनपट आपले मनोगत व्यक्त करताना मांडला. तर कॉलेजचे पर्यवेक्षक एम. डी. कांबळे यांनी कॉलेजमधील जुन्या आठवणींना उजाळा देताना आपण अनेक विद्यार्थी घडवले आहेत. त्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आपापल्या क्षेत्रात स्वतःची नाममुद्रा तयार केली आहे. याचा मला व तुमच्या बॅचच्या शिक्षकांना सार्थ अभिमान वाटत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या सोहळ्यात प्रत्येक विद्यार्थ्याने ‘वो भी क्या दिन थे’ असे म्हणत कॉलेज लाईफच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या.
कणकवली कॉलेज कणकवलीच्या २००३ – २००५ या बॅचचा स्नेहमेळावा कॉलेजचे पयक्षेवक एम. डी. कांबळे यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित केला होता. राष्ट्रगीताने या सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यानंतर सिद्धेश खटावकर व मनोज गवाणकर या विद्यार्थ्यांनी कांबळे सरांचे व विद्यार्थ्यांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. यावेळी कांबळे सरांचा बॅचच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कांबळे सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांनी केला माझा सत्कार अविस्मरणीय व आजवर झालेल्या सत्कारांपेक्षा अमूल्य असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांना या सोहळ्याची आठवण म्हणून गुलाबाचे फूल, स्मृतिचिन्ह देऊन सामूहिकरीत्या केक कापण्यात आला. सिद्धेश खटावकर व मनोज गवाणकर या विद्यार्थ्यांनी आपल्या बहारदार वकृत्वशैली आणि सुमधूर गाणी गाऊन उपस्थितांची मने जिंकली. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर १५ वर्षांत आपण कसे संघर्ष घडलो हे सांगताना प्रत्येक जण काही क्षणासाठी भावुक झाला. त्यानंतर सर्वांनी एकत्रीरीत्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर विद्यार्थी व कांबळे सर यांच्यामध्ये गप्पाटप्पा रंगल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी कॉलेज लाईफच्या आठवणी पुन्हा ताज्या करत त्या लाईफमध्ये घडलेले प्रसंग एकमेकांशी शेअर काही काळासाठी कॉलेज विश्वात पुन्हा रमले. त्यानंतर संगीत खुर्चीचा कार्यक्रम पार पडला. त्याच विशाल कासले यांची बाजी मारली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश आरेकर याने केले. तर आभार प्रदर्शन विशाल कासले याने केले. वंदे मातरम् या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या सोहळ्यास सुप्रिया ताटे, प्रणाली गोसावी, रेश्मा मांजरेकर, सकीर्ती भटगावकर, सविता वारंग, मेघा गोसावी, प्रविणा फोपे, राजेश चव्हाण, एकनाथ धनवटे, गौरेश डिचोलकर, मंगेश आरेकर, मनोज गवाणकर, सिद्धेश खटावकर, राकेश कदम, विशाल कासले, दीपक श्रावणकर, महेश पारकर, सतीश हळदिवे, गायत्रीकुमार उबाळे, इंद्रजित चव्हाण, स्वप्नील भरणकर, सुनील नेर्ले, तुषार हजारे आदी विद्यार्थी उपस्थित होते.
चौकट
सोशल मीडियामुळे आले एकत्र !
१२ वी पास आउट झाल्यानंतर बॅचमधील प्रत्येक विद्यार्थी विखुरलेला होता. तब्बल १५ वर्षांनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याचा शोध घेऊन सुप्रिया जाधव या विद्यार्थिनीने एक कणकवली कॉलेज कणकवली नावाचा व्हॉट्सअॅप गु्रप बनवला. त्या गु्रपवर चर्चा करून आणि प्रत्यक्ष संपर्क करून ३१ जानेवारी रोजी गेट टू गेदर करण्याचे सर्वांनुमेत ठरविले आणि त्या संदर्भातील नियोजनाच्या बैठकाही पार पडल्या. त्यानुसार गेट टू गेदर पार पडले अन् सर्वजण पुन्हा कॉलेजच्या विश्वात काही क्षणांसाठी पुन्हा रमले.