बारावी परीक्षेत कोकण विभागाच अव्वल ९७.५१ टक्के निकाल

बारावी परीक्षेत कोकण विभागाच अव्वल ९७.५१ टक्के निकाल

*कोंकण Express*

*बारावी परीक्षेत कोकण विभागाच अव्वल ९७.५१ टक्के निकाल..*

*बारावी परीक्षेत कोकण विभागाच अव्वल ९७.५१ टक्के निकाल..*

*पुणे, दि-२१*

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. यंदा राज्यात तब्बल ९३.३७ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१ टक्के निकाल लागला आहे. तर मुंबई विभागाचा ९१.९५ टक्के असा सर्वात कमी निकाल लागला आहे. बारावीच्या निकालात यंदा ही मुलींनी बाजी मारली आहे.

यावर्षी बारावीच्या परीक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये पार पडल्या, महाराष्ट्रातून यंदा बारावीची परीक्षा तब्बल १५ लाखांहून अधिक विद्याथ्यांनी दिली होती. या वर्षी चारावीचा एकूण निकाल ९३.३७% लागला. यंदा मुलांपेक्षा ३.८४ टक्क्यांनी जास्त

मुलींची टक्केवारी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नऊ विभागीय

मंडळांचा निकाल पुणे – ९४.४४, नागपूर ९२.१२, छत्रपती संभाजीनगर ९४.०८, मुंबई ९१.९५, कोल्हापूर ९४.२४, अमरावती –

९३.००, नाशिक – ९४.७१, लातूर ९२.३६, कोकण – ९७.५१ दरम्यान, महाराष्ट्र राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!