*कोंकण Express*
*उबाठा ला पराभव दिसत असल्याने खोटे नाटे आरोप;आमदार नितेश राणे*
*महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा विजय निश्चित झाला आहे*
*आमदार नितेश राणे यांनी बजावला मतदानाचा हक्क*
*कणकवली ः प्रतिनिधी*
उभाठा सेनेची विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची आमच्यासोबत ताकद नाही पक्षप्रमुखांनी व अन्य नेत्यांनी सभा घेतल्या एवढी आमच्यावर टीका केली पण आतापर्यंत ते लोक एकदाही बोलू शकले नाहीत की विनायक राऊत यांनी काय केले. गेली दहा वर्ष नेमकं या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील मुलांसाठी कोणते रोजगार दिला म्हणून मैदानात हरवू शकले नसल्यामुळे अशा पद्धतीचे आरोप करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची त्यामुळे एक निश्चित पद्धतीने सिद्ध होतं की विरोधकांनी पराभव मान्य केलेला आहे. त्यांना पराभव कळून चुकलेले आहे. कारण नामदार नारायण राणे हे जिंकलेले आहेत. फक्त आता लीड जवळपास साडेतीन लाखाने वाढत चालले आहे.असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

