भाजपला पराभूत करणे सर्वांची जबाबदारी

भाजपला पराभूत करणे सर्वांची जबाबदारी

*कोंकण Express*

*भाजपला पराभूत करणे सर्वांची जबाबदारी…*

*नितीन बानगुडे पाटील देवगड येथे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा..*

*देवगड ः प्रतिनिधी*

लोकसभा निवडणूक ही देशाच्या आणि जनतेच्या तसेच भावी पिढीच्या भवितव्याची निवडणूक असून गद्दार विरुद्ध निष्ठावंत हुकूमशाही विरुद्ध लोकशाही भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी निवडणूक असून या देशाच्या भवितव्यासाठी या निवडणुकीत भाजपला पराभूत करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे येथील मतदारांना आपल्या मतांची किंमत कळेल तेव्हा मतदार हा राजा असेल असे प्रतिपादन शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील यांनी देवगड येथील जाहीर सभेत बोलताना केले.

महाविकास (इंडिया) आघाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार खास. विनायक राऊत , यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते, गौरीशंकर खोत, जिल्हा प्रमुख सन्देश पारकर, सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, अतुल रावराणे, आम आदमी जिल्हा प्रमुख विवेक ताम्हणकर, संदीप कदम, राष्ट्रीय काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर,

तालुका अध्यक्ष उमेश कुळकर्णी, सूरज घाडी, सजाउद्दीन सोलकर, ऍड प्रसाद करंदीकर, तुषार भाबल : महिला उपजिल्हा संघटक, पूर्वा सावंत तालुका प्रमुख मिलिंद साटम युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर जिल्हा शिवसेना महिला संघटक हर्षा ठाकूर, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष नयना आचरेकर, व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

या निमित्ताने युवा तालुका प्रमुख गणेश गावकर, ऍड प्रसाद करंदीकर, सतीश सावंत, युवक जिल्हा अध्यक्ष किरण

टेंबुलकर , सुशांत नाईक, संदिप कदम, स्वप्नील धुरी, यांनी संबोधित केले.

यापुढे बोलताना नितीन बानगुडे पाटील म्हणाले भाजपच्या हुकूमशाहीला सुरुंग या महाराष्ट्रातूनच लागणार असून हा संघ ठाकरे सेनाच सेना लावेल. ही लढाई गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी आहे. कोकण भूमी ही निसर्ग संपन्न स्वर्ग असून देशाला सर्व क्षेत्रात संपन्नता कोकणात दिली आहे सुसंस्कृत राजकारण महाराष्ट्राचे एक वेगळी ओळख आहे, भाजपाने शिवसेनेला संपू पाहत आहे गद्दारानी शिवसेना फोडली पक्ष चिन्ह पळविले तरीदेखील ज्यावेळी मतांची किंमत कळणार आहे तेव्हाच मतदार हा राजा असेल असे सांगून या गद्दारांना या मतदानातून ताकद लोकसभा निवडणुकीत दाखवण्याची वेळ आली आहे, मतदान हीच या लोकशाहीची खरी ताकद असून कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला यापूर्वी होता. आजही आहे यापुढे राहील अशा विश्वास व्यक्त करून शिवसेनेला संपविण्याची संपविण्याची भाषा करणारे पुष्कळ पाहिले पण आजही शिवसेना तेवढीच खंबीरपणे उभी आहे.

रुपये ह्या निव्वळ घोषणा ठरल्या. देश आत्मनिर्भर बनविणार अशी घोषणा करणारे देशात विरोधी पक्ष संपून फक्त एक पक्ष एक देश असे धोरण आणण्याचा प्रयत्न करत आहे. एकाच वेळी १४६ खासदाराचे निलंबन करणे म्हणजे हुकूमशाही कडे हा देश जात असल्याचं उदाहरण आहे. असेही त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणावर प्रेम केले अधिका अधिकचा काळ हा त्यानी कोकणात घालवला या कोकणची

संपन्नता वाढविणारा खासदार आपल्याला हवा असून गेली दहा वर्ष खासदारकी च्या कारकीर्दीत कोकण विकासासाठी खासदार विनायक राऊत त्याच प्रेरणेने काम करीत आहेत. न्याय देणार कोकण न्याय देण्याला विकास व त्यासाठी आवश्यक असणारी श शांतता या कोकणात नांदने महत्त्वाचे आहे २०३६ साली देशाला खऱ्या अर्थाने महासत्ता बनवायचे असेल तर २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव हा महत्त्वाचा आहे. मराठी माणसांची मुंबई गुजराती मारवाडी यांच्याकडे जात आहे. कोकणात विनाशकारी प्रकल्प आले होते या विनाश कारी प्रकल्पांना खऱ्या अर्थाने शिवसेनेने विरोध करून हाकलून लावले या लोकसभा निवडणुकीत देखील विनायक राऊत यांचे हात बळकट करण्याकरता विजयाची सुतारी घेऊन आम्ही फिरत आहोत त्यासाठी सर्व जाती धर्म ती लोकांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र पण जपण्यासाठी ठामपणे पाठीशी उभे राहायचे आहे. असे सांगून खासदार विनायक राऊत असो अथवा आमदार वैभव नाही का असो त्यांच्या धमन्यातून एकच आवाज येईल जय महाराष्ट्र त्यामुळे ही निवडणूक गद्दाविरुद्ध निष्ठावंत असे असून त्यांच्या पाठीशी उभे र राहिले तरच लोकशाहीचे खऱ्या अर्थाने सामर्थ्य वाढेल. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जे बोलले ते करून दाखवले होते सर्वाधिक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून पाचव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गौरव झाला होता, असे असताना उद्धवजी पदावरून उतरले तरी जनतेच्या मनातून उतरले नाही मुंबई मुंबईला केंद्रशासित राज्य प्रदेश करण्याचा या सत्ताधाऱ्यांचे डाव असून शिवसेना लोकांच्या पाठीशी उभी राहत असताना या महाराष्ट्रात विनाशकारी विकास नको आहे. अशी भूमिका घेऊन आज कार्य करीत आहे. शिवसेना राष्ट्रवादी फोडाफोडीचेच काम या सत्ताधाऱ्याने केले असून मराठी माणसाला न्याय देण्यासाठी व आपली ताकद दाखवण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभे राहून यापूर्वी असलेला कोकणचा बालेकिल्ला शिवसेना आजही अभेद्य आहे यापुढेही असेल असे सांगून अन्यायविरुद्ध आवाज उठवणारे खासदार विनायक राऊत यांचा विजय म्हणजे सर्वसामान्य मतदारांचे उत्तर असेल यासाठी कोकणच्या विकासासाठी विनायक राऊत यांच्या मशाली समोरचे बटन दाबुन व सर्वाधिक मताधिक्याने विनायक राऊत विजयी होतील असा आत्मविश्वास ही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

यावेळी बोलताना सतीश सावंत म्हणाले, विनायक राऊत यांनी दहा वर्षात काय केले याची विचारणा करण्यापेक्षा मागील काही वर्षात येथील रखडलेली पंतप्रधान आवास योजना, त्याचा आढावा सर्वप्रथम घ्यावा तसेच देवगडचा रखडलेला रखंडलेला पाणी प्रश्न, याची माहिती द्यावी. ठिकठिकाणी कार्यकर्ते सरपंच फोडले तरीदेखील येथील मतदार हा न फुटता जेवढे कार्यकर्ते फुटतील त्याचे चौपट शिवसेनेचे मतदार वाढतील असा विश्वास ही त्यांनी बोलताना व्यक्त केला. आमदार वैभव नाईक यांनी केंद्र सरकारच्या पंतप्रधान मोदींच्या काळात केलेल्या घोषणां या फसव्या ठरल्या असून धर्माच्या जातीच्या नावावर राजकारण केले जात आहे मागील ३०-४० सत्ता उपभोगनाऱ्या येथील नेत्यांनी कोणते काम केले की स्वतःचा विकास केला हे विचारण्याची वेळ आली आहे या सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्याची संधी येथील मतदारांना लाभली असून या संधीचा फायदा त्यांनी घ्यावा व शिवसेनेला बहुमताने विजयी करावे असे आवाहन देखील या निमित्ताने केले

खास. विनायक राऊत यांनी आपल्या मार्गदर्शनात लोकशाहीचे विश्लेषण करणारी ही निवडणूक असून या निवडणुकीत भारताचे संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी व भारत मातेचे संरक्षण, करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणारी आहे. कोकण हे शिवसेनेचा श्वास व आत्मा आहे हे नाते मातोश्री वरील दैवतामुळे त्या माध्यमातून निर्माण झालेले नाते यापुढेही कोणीही तोडू शकणार नाही. नाग पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू यांसारखे आदर्श नेतृत्व या भागाला लाभले, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या आदर्श घेऊन कोणती घमेंड न बाळगता या कोकणातील एक सेवक म्हणून दहा वर्षे जनतेची सेवा केली आहे. कोकण परप्रांतीयांच्या घशात घालण्याचे काम येथील मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, करत असून हरियाणाच्या परप्रांतीयांना च्या घशात येथील जमीनी घालण्याचे काम केले जात आहे देवगडला काळा दगड, इको सेन्सिटिव्ह मध्ये टाकला. निसर्ग सौंदर्य मायनिंग ने नष्ट झाले कोकण किनारपट्टीवरील आनंदवाडी मंडळ प्रकल्प मार्गी लावण्यात शिवसेनेच्या माध्यमातून यश आले येथील जनतेला आवश्यक असणारा पाणीपुरवठा मुबलक व्हावा याकरिता आवश्यकता नळ पाणी योजनेचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून देवगड, जामसंडे पाणी मुक्त करण्याचे भाग्य शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आहे. २००८ पासून रखडलेला आनंदवाडी प्रकल्प खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लागला असून येथील कित्येक गावांवर सिडको प्राधिकरणाची नजर पडली आहे कोकणातील १६३२ ग्रामपंचायत ही नष्ट करण्याचे व सिडकोचे राज्य सिडकोचा बकासुर आणण्याचे काम या राज्यात सुरू आहे या पुढील काळात कोकणात सिडकोचा अधिकारी आला तरी आनंदवाडी प्रकल्पाचे खारे पाणी पाजल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. आपण विरोधात प्रकल्पाला विरोधात नसतो प्रकल्पाच्या नावाखाली जमीन हडप करणे व हॉटेल उभारणे याला आपला विरोध असतो असे सांगून शिवसेनेचा आजही रिफायनरीला विरोधच आहे आणि यापुढे रहाणार असून येथील जनतेला रिफायनरी नको आहे आपला शंभर टक्के निधी हा यापूर्वीही विकास कामांकरिता खर्च झाला असून त्याचा पुरावा देखील त्यांनी या सभेत खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेसमोर मांडला. चुकीचे आरोप करून निव्वळ बदनामी करणे याचे उत्तर येथील मतदार जनता निश्चितपणे ७ मे च्या लोकसभा निवडणुकीत देतील या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक प्यू होणारे खासदार म्हणून आपल्याला संधी लाभेल व विजयाची हॅट्रिक पूर्ण होईल अशा आत्मविश्वासही अन 不 ऊत यांनी बोलताना व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!